ऊसदराची कोंडी तुटल्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्हय़ातील साखर कारखान्यांनी ऊस गाळप करण्याच्या दृष्टीने हालचाली गतिमान केल्या आहेत. सोमवारी नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ पार पडला. उर्वरित कारखाने उद्या, परवा सुरू होणार असल्याचे साखर कारखाना सूत्रांनी सांगितले आहे. यापैकी कोणता कारखाना २ हजार ५०० पेक्षा अधिक दर जाहीर करतो, याकडे लक्ष लागले आहे. राज्य शासनाने १५ नोव्हेंबरपासूनच साखर कारखाने सुरू व्हावेत, यादृष्टीने नियोजन केले होते. ऊसदर निश्चित न झाल्याने शेतकऱ्यांकडून ऊस देण्यास विरोध झाला होता. तर ऊसदरावरून शेतकरी संघटनांनी आंदोलन तापवत ठेवले होते. याची दखल घेत साखर कारखानदारांच्या तीन बैठका झाल्या. काल अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन पहिली उचल २ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय झाला. पाठोपाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनीही ही उचल मान्य केली. पण शेतकऱ्यांनी आणखी थोडा वेळ थांबावे, त्यांना याहून चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. अडीच हजार दर देणाऱ्या कारखान्यांची ऊसतोडणी व वाहतूक थांबवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.                

IIT will take help to prevent suicides from Atal Setu Mumbai print news
अटल सेतूवरून होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी आयआयटीची घेणार; ‘एमएमआरडीए’ लवकरच तज्ज्ञांची समिती स्थापन करणार
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Yarn mills in the state are on the verge of closure
राज्यातील सूतगिरण्या बंद पडण्याच्या मार्गावर!
villagers protested against daighar garbage project
ठाण्यात पुन्हा कचराकोंडीची चिन्हे; डायघर प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध, देयके मिळत नसल्याने ठेकेदाराने रोखल्या घंटागाड्या
Pench tiger project administration, Villagers
पेंच व्याघ्रप्रकल्प प्रशासनाविरोधात गावकरी रस्त्यावर
ulhas nadi bachav kruti samiti ask question to state govt over ulhas river pollution
मराठवाड्याला प्रदूषित पाणी देणार का? उल्हास नदी बचाव कृती समितीचा राज्य सरकारला सवाल
Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य