कर्जत : कारगिल युद्ध.. त्यावेळी देशाच्या सैनिकांनी प्राणपणाने आपल्या सीमांच केलेले संरक्षण.. त्यासाठी दिलेली प्राणांची आहुती.. आणि हुबेहूब हा प्रसंग कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील शारदाबाई सभागृह येथे विद्यार्थ्यांनी रंग दे बसंती शोला या कार्यक्रमांतर्गत उभा केला. यामध्ये सैनिक भरतीपासून शस्त्रास्त्र लढायची दृश्य सैनिकांची सुट्टी आपत्ती काळातील सैनिकांची होणारी अडचण देशभक्ती घरातील लहान मुलांची भावनिक व वैचारिक समस्या. युद्धामध्ये सैनिकाचा सहभाग, सैनिकांची कर्तव्य तसेच युद्धामध्ये देश संरक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांची भूमिका व बटालियनकडून शहीद जवानांच्या कुटुंबियांना कळविलेला मेसेज, शहीद जवानांची शवपेटी घरी आल्यानंतर त्याच्या घरच्यांचा झालेला आक्रोश, लहान मुलांनी फोडलेला टाव्हो हा संवाद व दृश्य पाहून शारदाबाई पवार सभागृहामध्ये बसलेल्या पाहुण्यांपासून प्राचार्य व विद्यार्थी विद्यार्थिनींचे डोळे पाणावले व अश्रू अनावर झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा