शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील हे भाजपात आले आहेत. त्यानंतर धैर्यशील पाटील यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं आहे. धैर्यशील पाटील हे चांगले वक्ते आहेत, तसंच प्रत्येक गोष्टीचा ते सखोल अभ्यास करतात. मी मुख्यमंत्री असताना अनेक प्रश्न घेऊन माझ्याकडे ते आले होते जनतेत राहून जनतेची कामं करणं यासंदर्भातलं त्यांचं सातत्य महत्त्वाचं आहे. धैर्यशील पाटील भाजपात असले पाहिजेत असं आम्हाला वाटत होतं आणि त्यांचा प्रवेश झाल्याने आम्हाला आनंद होतो आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. धैर्यशील पाटील हे फक्त राजकारणासाठी राजकारण करणारे नाहीत. तर समाजाचं हित समोर ठेवून राजकारण करणारे आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आपले प्रश्न धडाडीने धैर्यशील पाटील मांडत असत. धैर्यशील पाटील यांनी कायमच समाजाभिमुख राजकारण केलं. तळगाळातील लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी लढा दिला आहे. आज देशाचं नेतृत्त्व नरेंद्र मोदी करत आहेत. त्यांचं नेतृत्त्वही असाच विचार करणारं आहे. त्यामुळे मी हे सांगू इच्छितो की धैर्यशील पाटील यांनी पक्ष बदलला असला तरीही त्यांचा विचार बदललेला नाही. त्यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Veteran singer Asha Bhosle statement on Narendra Modi and Yogi Adityanath
म्हणून मला मोदी अन् योगी आवडतात….ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वक्तव्य
Delhi Election Result
Delhi Election Result : दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले…
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान

महाराष्ट्रात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होमार आहेत. त्याआधी महाविकास आघाडीला जितकं कमकुवत करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केला आहे. महाविकास आघाडीचे आजी-माजी आमदार आपल्याकडे ओढण्यासाठी भाजपा पूर्ण प्रयत्न करते आहे. आज शेकापच्या धैर्यशील पाटील यांनी केलेला प्रवेश हेच सांगून जातो आहे. मुंबई भाजपाच्या प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपाचा गमछा धैर्यशील पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतला. रायगड पालीमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता पालरेचा आणि शेकापचे दिलीप भोईर यांनी यापूर्वी भाजपात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता धैर्यशील पाटील हे देखील भाजपात आले आहेत. त्यामुळे रायगडमधला शेतकरी कामगार पक्ष कमकुवत झाला आहे.

Story img Loader