अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यापासून शिंदे गटाकडून पुन्हा त्यांना अर्थमंत्रीपद देण्याला विरोध सुरू झाला. मात्र, अखेर नव्याने झालेल्या खातेवाटपात पुन्हा एकदा अर्थखातं अजित पवारांकडेच गेलं आहे. आता शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी या खातेवाटपावर प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (१४ जुलै) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

दीपक केसरकर म्हणाले, “हे युतीचं सरकार आहे आणि युतीच्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. पाठिंबा देताना देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला विकास आणि या सरकारचा विकास पाहून राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा दिला आणि आमच्या सरकारमध्ये आले.”

Rajendra Deshmukh karjat
आमदार राम शिंदे व भाजपाला रोहित पवार यांनी दिला मोठा धक्का! भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
CM Eknath Shinde will go guwahati once again
Eknath Shinde: निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार; कारण काय? शिंदे गटाचे नेते म्हणाले…
cm eknath shinde criticizes opposition
योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखविण्याची वेळ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
cm Eknath shinde
अजित पवारांना बरोबर घेऊनच निवडणूक लढू! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही, अमित शहांशी चर्चा
Dipesh Mhatre, Shinde supporter, Dombivli,
डोंबिवलीतील शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश
sanjay shinde who killed akshay shinde in an encounter get discharged from hospital
अक्षय शिंदे याला चकमकीत ठार करणाऱ्या संजय शिंदे यांना डिस्चार्ज
CM Eknath Shinde claims that there is no dissatisfaction in allocation of seats in mahayuti
महायुतीत जागा वाटपात नाराजी नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

संजय राठोडांचं खातं का काढलं?

संजय राठोडांचं खातं का काढलं? यावर दीपक केसरकर म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसला जी खाती हवी होती ती खाती ज्यांच्याकडे होती त्यांना विचारलेलं असणार आहे. संजय राठोड आणि माझी भेट झालेली नाही. परंतू अब्दुल सत्तार यांची भेटी झाली होती. त्यांनी सांगितलं की, कृषी खातं राष्ट्रवादीला दिलं तर चालेल का असं त्यांना विचारण्यात आलं. त्यांनी हो म्हणून सांगितलं.”

हेही वाचा : अन्न व नागरी पुरवठा खातं मिळाल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“आम्ही आपआपसात समजुतीने सगळं करतोय”

“याचा अर्थ विचारून खाती घेतली आहेत. आम्ही आपआपसात समजुतीने सगळं करत असू तर माध्यमांनी त्यात संशय घेण्याचं काही कारण नाही. अब्दुल सत्तार हे त्यांच्या मतदारसंघातून अनेक वर्षांपासून प्रचंड बहुमताने निवडून येतात. यापुढेही ते निवडून येतील. त्यांना जे खातं दिलं गेलं ते यापुढेही चांगलं चालवतील याची मला खात्री आहे,” असंही केसरकरांनी नमूद केलं.