“मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास सुरू आहे”, अशी टीका शुक्रवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली होती. या टीकेला शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “तुमच्यासाठी मुंबई दुभती गाय होती. या मुंबईचे तुम्ही लचके तोडले होते. मुंबईत आता शिंदे सरकार करत असलेलं काम आपल्याला का बरं जमलं नाही? २५ वर्षं मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. त्यावेळी तुम्ही काय केलंत? तर तुम्ही दोन मातोश्री बांधल्या”, असा हल्लाबोल म्हात्रे यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मुंबई तुमच्यासाठी सोन्याचं अंडी देणारी कोंबडी, पण आमच्यासाठी कर्मभूमी-जन्मभूमी”

“सत्ता गेल्याची खंत आदित्य ठाकरेंना आहे. आपण अनेक गोष्टी करू शकलो नाही, त्या गोष्टी आता होत आहेत, याच्या त्यांना वेदना होत आहेत”, असंही शीतल म्हात्रेंनी म्हटलं आहे. “शिंदे-फडणवीसांचं सरकार उत्तम काम करत आहे. ज्या गोष्टी २५ वर्ष तुम्हाला सुचल्या नाहीत, त्या गोष्टी आज होत आहेत. या सरकारच्या कामाचा धडाका पाहता येत्या अडीच वर्षांमध्ये मुंबईची स्थिती प्रत्येक मुंबईकराला अभिमानास्पद वाटावी, अशी होणार आहे”, असं म्हात्रे म्हणाल्या आहेत.

“मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास”, आदित्य ठाकरेंची टीका; पाच हजार कोटींच्या रस्त्यांवरुनही सरकारवर निशाणा

“घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या रस्त्यांसाठी पाच हजार कोटींची घोषणा केली होती. त्यासाठी काढलेले टेंडर रद्द करण्यात आले आहे”, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. “पाच हजार कोटींची घोषणा केल्यानंतर मुंबईतील रस्ते रातोरात खड्डेमुक्त होतील, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. येत्या पावसाळ्यात जर खड्ड्यांमुळे मुंबईकरांचे हाल झाले, तर त्यासाठी मुख्यमंत्रीच जबाबदार असतील”, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला आहे. या आरोपांना शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले.

“मुंबई तुमच्यासाठी सोन्याचं अंडी देणारी कोंबडी, पण आमच्यासाठी कर्मभूमी-जन्मभूमी”

“सत्ता गेल्याची खंत आदित्य ठाकरेंना आहे. आपण अनेक गोष्टी करू शकलो नाही, त्या गोष्टी आता होत आहेत, याच्या त्यांना वेदना होत आहेत”, असंही शीतल म्हात्रेंनी म्हटलं आहे. “शिंदे-फडणवीसांचं सरकार उत्तम काम करत आहे. ज्या गोष्टी २५ वर्ष तुम्हाला सुचल्या नाहीत, त्या गोष्टी आज होत आहेत. या सरकारच्या कामाचा धडाका पाहता येत्या अडीच वर्षांमध्ये मुंबईची स्थिती प्रत्येक मुंबईकराला अभिमानास्पद वाटावी, अशी होणार आहे”, असं म्हात्रे म्हणाल्या आहेत.

“मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास”, आदित्य ठाकरेंची टीका; पाच हजार कोटींच्या रस्त्यांवरुनही सरकारवर निशाणा

“घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या रस्त्यांसाठी पाच हजार कोटींची घोषणा केली होती. त्यासाठी काढलेले टेंडर रद्द करण्यात आले आहे”, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. “पाच हजार कोटींची घोषणा केल्यानंतर मुंबईतील रस्ते रातोरात खड्डेमुक्त होतील, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. येत्या पावसाळ्यात जर खड्ड्यांमुळे मुंबईकरांचे हाल झाले, तर त्यासाठी मुख्यमंत्रीच जबाबदार असतील”, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला आहे. या आरोपांना शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले.