राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. आमदारांमध्ये गटबाजी होत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. यावर शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. “खोकेवाले आमदार म्हटलं जात असल्यानं वेदना होतात. शिंदे गटातील ५० आमदारांचं ते दु:ख आहे. त्याबाबत काही आमदारांनी मला फोन करत यातून मोकळं होण्याची इच्छा व्यक्त केली होती”, असे स्पष्टीकरण कडू यांनी दिले आहे.

“माझं राजकारण चुलीत गेलं तरी बेहत्तर, पण…”, बच्चू कडूंचा इशारा; म्हणाले, ” एक तारखेला ट्रेलर येणार!”

Vasai Rajiv Patil, Bahujan Vikas Aghadi claim,
वसई : राजीव पाटील यांच्यावर अन्याय नाही; बविआचा दावा, ताकदीने निवडणूक लढवणार
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
manoj jarange patil criticized devendra fadnavis
“आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही”, आचारसंहिता जाहीर होताच मनोज जरांगेंचा थेट इशारा; म्हणाले…
Ajit Pawars trusted Bhausaheb Bhoir rebelled deciding to contest Chinchwad elections independently
चिंचवड : अजित पवारांच्या पक्षातून बंडखोरी; ‘या’ नेत्याने केला अपक्ष लढण्याचा निर्धार
Devendra Fadnavis on nitin gadkari
“अनुदानाची शाश्वती नाही, लाडकी बहीणसाठी पैसे द्यावे लागतात”, नितीन गडकरींच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
Narendra Modi statement that the people of Kashmir are waiting for a terror free government print politics news
काश्मिरी जनतेला दहशतवादमुक्त सरकारची प्रतीक्षा – मोदी
Sarsanghchalak Mohan Bhagwat appeal to the bjp new generation regarding Pt DeenDayal Upadhyay
भाजपच्या आजच्या पिढीने दीनदयाळजींचे गुण अंगीकारावेत; सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
नव्यांचे लाड करताना जुन्या कार्यकर्त्यांनाही संधी द्या! भाजप नेत्यांची नेतृत्वाकडे मागणी

“राजकारणात तडजोडी कराव्या लागलात. मात्र, गुवाहाटीला गेल्यानंतर लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. या तडजोडीचे दुष्परिणाम भोगावे लागले”, असेही कडू यावेळी म्हणाले. “राजकारणात या तडजोडी असतातच. या तडजोडी फार पूर्वीपासून करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही या तडजोडी केल्या होत्या. मुघलांना शह देण्यासाठी निजामांना हाती पकडावचं लागलं”, असे कडू यांनी म्हटले आहे.

“..मग मला कुणी पैसे दिले? एकनाथ शिंदेंनी की देवेंद्र फडणवीसांनी?”, बच्चू कडूंचा रवी राणांच्या आरोपांवर संतप्त सवाल!

“टाकीवर चढल्याने आधी मला लोक विरूवाले आमदार म्हणायचे. मग भिडू म्हणत होते. काही ठिकाणी अपंगांचा कैवारी म्हणत होते. आता त्यात खोका आल्यानं वेदना होतायत” अशी भावना यावेळी कडू यांनी व्यक्त केली. “राजकारणात कोणासोबत गेल्यानं पैसेच घेतले, असा त्याचा अर्थ होत नाही. राणा आधी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. मग त्यांनी खोके घेतले असं आम्ही म्हणायचं का?” असा सवाल त्यांनी केला आहे.

पाहा व्हिडीओ –

खोक्यांचा वाद पेटला! बच्चू कडू रवी राणांवर ठोकणार ५० कोटींचा दावा

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपक्ष आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात सुरू असलेला कलगीतुरा चर्चेचा विषय ठरत आहे. पैसे घेऊन बच्चू कडूंनी सरकारला पाठिंबा दिल्याचा आरोप रवी राणा यांनी केल्यानंतर बच्चू कडूंनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, एक तारखेचा अल्टिमेटमही त्यांनी दिला आहे. या काळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.