सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटांमधील खटल्यांवर सुनावणी सुरु आहे. पाच सदस्यीय खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी सुरु असून ठाकरे गट आणि शिंदे गट वेगवगेळ्या मुद्द्यांवर आपली बाजू मांडत आहेत. या याचिकांमध्ये शिवसेनेतून बंड करुन बाहेर पडलेल्या १६ आमदारांच्या पात्रतेचा मुद्दा, शिवसेनेवर हक्क शिंदे गटाचा की उद्धव ठाकरे गटाचा यासारख्या प्रश्नांसंदर्भातील उत्तरं मिळणार आहेत अपात्र आमदारांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचाही समावेश असल्याने राज्यातील सरकार राहणार की पडणार याचा निकाल आमदार अपात्रतेच्या याचिकेवर अवलंबून आहेत. त्याचबरोबर सत्ता स्थापनेसंदर्भातील घटनात्मक बाबीही या प्रकरणांमध्ये पडताळून पाहिल्या जाणार आहेत. असं असतानाचज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी एका चर्चासत्रादरम्यान सत्तास्थापनेसंदर्भात भाष्य करताना २०१९ सालीच्या सत्तासंघर्षाचा संदर्भ देत विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक मोठी चूक केल्याचं नमूद केलं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्थापन केलेल्या पहाटेच्या सरकारच्या संदर्भात बापट यांनी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याशी बोलताना हे विधान केलं.
नक्की वाचा >> Thackeray vs Shinde: “..तर ते डायरेक्ट अपात्र ठरले असते”; शिंदे गटाबद्दल बोलताना ‘त्या’ पत्राचा उल्लेख करत उज्ज्वल निकम यांचं विधान
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा