येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपा यांची युती होणार की नाही याबाबत अद्यापही संभ्रम आहे. युतीबाबत भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात फोनाफोनीही झाली पण अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही. त्यातच शिवसेनेने पुन्हा एकदा सामना या मुखपत्रातून भाजपावर निशाणा साधला आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत एकदिवसीय उपोषण केलं होतं, त्यांच्या मंचावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. नायडूंच्या मंचावर उपस्थित राहिल्याने शिवसेनेवर भाजपाने टीका केली, त्यावरुन ‘जळणाऱ्यांनो जळत रहा’ अशा मथळ्याखालील अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाला वाकुल्या दाखवण्याचं काम केलं आहे. तसंच, जम्मू-काश्मीरमधील पीडीपी सोबतच्या सत्तेची आठवण करुन देत आम्हाला टीडीपी आणि पीडीपीतला फरक चांगलाच कळतो असंही सुनावलं आहे. पाहुयात काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात –
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा