Shiv Sena Vs Atul Save : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. महायुतीमध्ये आधी मंत्रिपदे, नंतर खातेवाटप आणि आता पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी भाजपा-शिवसेना (एकनाथ शिंदे), काही ठिकाणी भाजपा-राष्ट्रवादी (अजित पवार) तर काही ठिकाणी राष्ट्रवादी (अजित पवार)-शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री पालकमंत्रीपदावर दावे ठोकत आहेत. अशात आता, यापूर्वी जालन्याचे पालकमंत्री म्हणून काम केलेल्या अतुल सावे यांना यावेळी जालन्याचे पालकमंत्रीपद देण्यास शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी विरोध केला आहे.

काय म्हणाले शिवसेना जिल्हाप्रमुख?

जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत बोलताना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे म्हणाले, “पालकमंत्री कोणाला करायचे हा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांचा आहे. एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये शेजारचा जिल्हा म्हणून अतुल सावे यांना जालन्याचे पालकत्व दिले होते. पण अतुल सावे यांनी या काळात शिवसेना असो भाजपा असो की राष्ट्रवादी, कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारात घेतले नाही. त्यामुळे सर्वांचा रोष आहे. आमच्या सर्वांची मागणी आहे की, अतुल सावे सोडून कोणालाही जालन्याचे पालकमंत्री करावे. जर या मंत्रिमंडळात अर्जुन खोतकर, नारायण कुचे, बबनराव लोणीकर किंवा संतोष दानवे असते तर जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला असता.”

Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार
Nitish Kumar and Chandrababu Naidu on UGC
यूजीसीच्या मसुद्यावरून एनडीएमध्ये अस्वस्थता; जेडीयूची स्पष्ट नाराजी, तर टीडीपी, लोजपकडून सावध पवित्रा

पुढे बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणाले, “गेल्या सरकारच्या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी झाली. याबाबत अतुल सावे यांना कळवले, पण त्यांनी ढुंकूनही याकडे पाहिले नाही. यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. या जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उभे केले होते. त्याकडेही ते फिरकले नाही. जरांगे पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हरवले आहेत, विधानही भरसभेत केले होते.”

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाबाबत अतुल सावेंचं मोठं विधान; म्हणाले, “…तो निर्णय आम्हाला मान्य असेल”

संभाजीनगरसाठीही रस्सीखेच

यापूर्वी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्यामध्ये संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावरून सामना रंगल्याचे पाहायला मिळाले होते. संजय शिरसाट यांनी, “छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार, पण यासंदर्भातील औपचारीक घोषणा बाकी आहे”, असे म्हटले होते.

यावर बोलताना अतुल सावे यांनी, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल”, असे म्हटले होते.

Story img Loader