शिवसेना पक्षाचा ५८ वा वर्धापन दिन बुधवारी पार पडला. शिवसेनेतील फूटीनंतर आता दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात आले आहेत. यामध्ये वरळीत शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच शिवसेना ठाकरे गटाचं नाव बदलून आता उठा बसा संघटना ठेवायला पाहिजे, असं म्हणत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस काठावरही पास झाली नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शिवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत कोण जिंकलं? कोणाचा पराभव झाला हे स्पष्ट आहे. खरी शिवसेना कोणाची? याचा निकाल या निवडणुकीत जनतेने दिला आहे. आपण निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या न्यायालयात गेलो होतो. मी तुम्हाला आठवण करून देतो की, यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये लोकांनी ट्रेलर दाखवला होता. तेव्हा सर्वात जास्त जागा महायुतीच्या निवडून आल्या होत्या. तसेच शिवसेना शिंदे गट २ हजार २०० ग्रामपंचायतीमध्ये जिंकला होता. त्यावेळी शिवसेना ठाकरे गट कितव्या नंबरवर होता? ते कोणालाही माहिती पडलं नाही. त्यामुळे खरी शिवसेना कोण? हे सांगण्याची आवश्यकता नाही”, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली.

petitioner demand in bombay hc to file case against eknath shinde and nitesh rane over anti muslim remarks
मुस्लिमविरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप, मुख्यमंत्री शिंदे आणि नितेश राणेंविरूद्ध गुन्हा दाखल करा, याचिकेद्वारे मागणी
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Amit Shah Nitin Gadkari Deputy Chief Minister Devendra Fadnavis Chandrasekhar Bawankule lead for Assembly elections 2024 in bjp
तिहेरी नेतृत्व; विधानसभेसाठी भाजपची धुरा गडकरी, फडणवीस, बावनकुळेंकडे
Congress leaders in Nagpur claimed that state president Nana Patole will be the next chief minister
“पुढचा मुख्यमंत्री विदर्भातीलच,” काँग्रेस नेत्यांचा नाना पटोलेंच्या नावावर…
Eknath Shinde Buldhana, Congress leaders Buldhana,
बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात घुसण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न; काळे झेंडे दाखविले
Navi Mumbai Semiconductor Project, Eknath Shinde,
राज्यात आमचेच सरकार असणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
mahayuti will contest assembly elections under the leadership of cm eknath shinde says ajit pawar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक; अजित पवार यांची माहिती
Tejashwi Yadav on Nitish Kumar
Tejashwi Yadav on Nitish Kumar: ‘नितीश कुमार आमच्याकडे हात जोडत आले’, तेजस्वी यादव यांचा आरोप; म्हणाले, “पुन्हा चूक…”

हेही वाचा : “तुम्हाला भेंडी बाजार सारखा…”, एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, “मतदारसंघात नाही पत अन् माझं नाव गणपत”

“वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार हा आपला आहे. आता शिवसेना ठाकरे गटाने दुसरं काहीतरी नाव ठेवायला पाहिजे. ठाकरे गट उठा बसा संघटना आहे. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने ३२८ जागा लढवल्या होत्या. पण काँग्रेस काठावरही पास झाली नाही. मात्र, देशात इंडिया आघाडीचं सरकार आलं की काय? एवढा उन्माद केला. १२ जागांवर पराभव झालेला ठाकरे गट आता जीत का जश्न मना रही है. त्यांना आता अशीच भाषा वापरावी लागेल. गिरे तो भी टांग उपर, हे शब्द त्यांना लागू होतात. एखादं लहान बाळही सांगेल की, ठाकरे गट काँग्रेसच्या व्होट बँकेमुळे जिंकली आहे. काँग्रेसच्या व्होट बँकेने ठाकरे गटाला तारलं आहे. एवढ्या जागा लढवून देखील फक्त ९ जागा आल्या. सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडणारे हे लाचार आहेत”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

भेंडी बाजार सारखा मतदारसंघ शोधावा लागेल

“औरंगजेबाची वाहवा करणाऱ्यांच्याबरोबर तुम्ही बसता. मतांसाठी कुठून फतवे निघाले? हे सर्वांना माहिती आहे, हा मेळावा वरळीमध्ये होत आहे. या ठिकाणी ठाकरे गटाला निवडणुकीत जेमतेम ६ हजारांचा लीड मिळाला. आता काही म्हणत होते, आम्ही या ठिकाणी ५० हजारांचा लीड घेणार. आता कुठं गेले लीड देणारे. निवडणुकीत पराभव करतो असं म्हणणारे आता कुठं गेले? आता कसे जिंकणार? श्रीकांत शिंदे तर सोडा. नरेश म्हस्के खासदार होण्याच्या आधी म्हणाले मी महापालिकेला उभा राहतो, माझ्या समोर त्यांना उभ राहूद्या. मग आता कसे जिंकणार? तुम्हाला भेंडी बाजार सारखा मतदारसंघ शोधावा लागेल. मतदारसंघात नाही पत आणि माझं नाव गणपत, अशी अवस्था झाली”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली.