राज्यसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून महाविकास आघाडीचे तीन भाजपाचे तीन उमेदवार निवडून आले आहेत.दुसरीकडे भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाल्यामुळे हा विजय म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे यश असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या निवडणुकमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत निवडणूक आयोगाने बाद ठरवल्यामुळे त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात सुहास कांदे कायदेशीर लढा देणार आहेत.

हेही वाचा >> राज्यसभा निवडणूक निकालांनंतर संभाजीराजे छत्रपतींचं सूचक ट्वीट, तुकाराम महाराजांच्या अभंगातील ‘या’ ओळींचा उल्लेख!

Delhi Assembly Elections 2025 Seven AAP MLAs resign
‘आप’च्या सात आमदारांचे राजीनामे; पक्ष नेतृत्व विचारसरणीपासून दूर जात असल्याचा आरोप
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
chief minister devendra fadnavis appointment of ministers staff swearing ceremony
मंत्र्यांच्या शपथविधीला दीड महिना होऊनही कर्मचारी नियुक्ती प्रलंबित असल्याने अडचणी
आरएसएसचे कार्यकर्ते ठेवणार मंत्र्यांच्या 'कारभारा'वर लक्ष; महायुती सरकारमध्ये नेमकं घडतंय काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : आरएसएसचे कार्यकर्ते ठेवणार मंत्र्यांच्या ‘कारभारा’वर लक्ष; महायुती सरकारमध्ये नेमकं घडतंय काय?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्याचे राजकारण तापणार

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर तसेच शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्याची मागणी भाजपाने केली होती. तर महाविकास आघाडीने भाजपाचे सुधीर मुनगंटीवार तसेच अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावर आक्षेप नोंदवला होता. मात्र निवडणूक आयोगाने जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुधीर मुनगंटीवार, रवी राणा यांची मतं ग्राह्य धरत सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले. कांदे यांचे मत बाद झाल्यामुळे संजय राऊत यांचा निसटता विजय झाला. ते पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये काठावर पास झाले आहेत.

हेही वाचा >> “शिवसेना महाविकास आघाडीतील ‘ढ’ टीम असल्याचे पुन्हा सिद्ध”; राज्यसभा निवडणुकीवरुन मनसेचा टोला

मत बाद ठरवण्यात आल्यानंतर सुहास कांदे कायदेशीर लढाई देणार आहेत. तसे वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे. त्यामुळे आगामी काळात सुहास कांदे न्यायालयात आपली बाजू कशी मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा >> राज्यसभा निवडणूक | विजयानंतर अनिल बोंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘यालाच म्हणतात जोर का झटका धीरेसे’

राज्यसभेच्या निवडणुकीत कोणाचा विजय कोण पराभूत?

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन तर भाजपाचे तीन उमेदवार निवडून आले. काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत यांचा विजय झाला. तर भाजपाचे डॉ. अनिल बोंडे, पीयुष गोयल आणि धनंजय माहडिक विजयी झाले. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला.

Story img Loader