विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अनेक विषयांवरून आमने-सामने आले आहेत. महागाई, बेरोजगारी यासह अनेक मुद्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असतानाच सोमवारी (१ जुलै) विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आला. यावर आज भारतीय जनता पार्टीकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात येत आहे.

यासंदर्भात अंबादास दानवे यांनी सभागृहाची माफी मागावी, तसेच अंबादास दानवेंचं निलंबन करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या गोंधळावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. “भाजपाच्या टोळ्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांनी अंबादास दानवे यांची पाठराखण केली आहे.

bachhu kadu latest news,
“एसटी चालकाला १२ हजार रुपये पगार देता, लाज वाटत नाही का?” बच्चू कडूंचा सरकारला सवाल; दादा भुसेंनीही दिले प्रत्युत्तर, म्हणाले..
Ambadas Danve On BJP MLA Prasad Lad
“..तर लाडांना चांगलाच ‘प्रसाद’ दिला असता”, अंबादास दानवे विधानपरिषदेतल्या राड्यानंतर पुन्हा आक्रमक
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Amol Mitkari
लाडकी बहीण योजनेत विरोधकांकडून गैरव्यवहार? अमोल मिटकरी म्हणाले, “सेतू केंद्रांवर एजंट सोडून…”
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
Uddhav Thackeray Express Photo By Ganesh shirsekar (1)
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : “मला सांगा, राहुल गाधींनी कुठे हिंदुत्वाचा अपमान केला?” उद्धव ठाकरेंचा थेट सवाल; म्हणाले, “प्रभू शंकराचा फोटो दाखवण्यावर…”
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा

हेही वाचा : “..तर लाडांना चांगलाच ‘प्रसाद’ दिला असता”, अंबादास दानवे विधानपरिषदेतल्या राड्यानंतर पुन्हा आक्रमक

संजय राऊत काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीस यांच्या हातात जेव्हापासून राज्याची सूत्र गेली आहेत. तेव्हापासून त्यांनी ज्या भारतीय जनता पक्षाची झालर टाकून टोळ्या बनवल्या आहेत. त्या टोळ्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेत्याचे सर्व शिष्टाचार पाळले आहेत. पण आमच्या अंगावर कोणी येत असेल तर शिवसैनिक म्हणून आम्हाला त्यांच्यावर त्या पद्धतीने चाल करावी लागेल. या सर्व लोकांना हिंदुत्व काय माहिती? हे सर्व लोक देवेंद्र फडणवीसांनी गोळा केलेले आहेत. जे दिल्लीमध्ये आहे तेच महाराष्ट्रात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेला एकही माणूस हा खऱ्या भारतीय जनता पक्षाचा नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

विधानपरिषदेतील गोंधळावर दानवे काय म्हणाले?

“भारतीय जनता पार्टीने आम्हाला नियम आणि कायदे शिकवण्याची गरज नाही. भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींना आणि १५० खासदारांना संसदेमधून निलंबित केलं होतं. त्यामुळे भाजपाने संसदीय भाषा आणि नियम, कायदे उद्धव ठाकरे यांना आणि मला शिकवण्याची गरज नाही. प्रसाद लाड हे राजकारणात नवीन आहेत.मला वाटतं या ठिकाणी राजीनाम्याची मागणी करून काय होणार? त्यांनी न्यायालयात जावं. आता त्यांना काय करायचं ते करुद्या. कारण त्यांना कायदे आणि संविधान आता आठवायला लागले आहेत. आतापर्यंत भाजपाला कायदे म्हणजे त्यांच्या घरची जहांगिरी किंवा त्यांच्या घरी पाणी भरणारे वाटत होते. पण आता त्यांना कायद्याची जाणीव झाली हे चांगलं आहे”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.