भारतीय जनता पार्टीने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना शनिवारी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे उत्तर मध्य मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्यात सामना होणार आहे. भाजपाने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे. “प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम हे उत्तर मध्य मुंबईमधून भाजपाचे उमेदवार जरी असले तरीही ती जागा महाविकास आघाडी जिंकेल”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“माझ्या माहितीनुसार उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात भाजपाच्या अनेक नेत्यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला. त्या भागात कोणीही उमेदवारी घेण्यास तयार नव्हतं. उज्ज्वल निकम यांनी जळगावमधून उमेदवारी घ्यायला हवी होती. पण अर्थात तो त्यांचा प्रश्न आहे. आता या मतदारसंघात नक्कीच चांगली लढत होईल”, असा टोला संजय राऊत यांनी महायुतीला लगावला.

Saif Ali Khan was brutally attacked by a robber (Photo- Indian Express )
Kareena Kapoor : “करीना कपूर २१ कोटींचं मानधन घेते तरीही तिला सुरक्षारक्षक आणि…”, सैफ हल्ला प्रकरणावरुन ‘या’ अभिनेत्याचा टोला
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
How successful will the government efforts to extradite fugitive accused be
राणानंतर मल्ल्या, बिश्नोई, नीरव मोदीचा नंबर कधी..? फरार आरोपींच्या प्रत्यर्पणासाठी सरकारच्या प्रयत्नांना किती यश मिळेल?
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”

हेही वाचा : ‘उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याप्रती लोकांमध्ये सहानुभूती’, छगन भुजबळ याचं आश्चर्यजनक विधान

“महायुती अद्याप मुंबईमधील दोन मतदारसंघात उमेदवार जाहीर करू शकले नाही. तसेच ठाणे, कल्याण डोंबिवलीमध्येही अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नाही. नाशिकमध्येही अद्याप उमेदवार दिला नाही. खरं तर तो शिंदे गट नाही तर शिवसेना फडणवीस गट आहे. मोदी-शाह प्रायव्हेट लिमिटेड आहे. काही ठिकाणी त्यांना फक्त औपचारीकता म्हणून उमेदवार दिले आहेत. जसे काल उत्तर मध्य मुंबईत वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. त्यामुळे महाराष्ट्रात या क्षणाला महाविकास आघाडी ३० ते ३५ जागा जिंकेल”, असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

राऊत पुढे म्हणाले, “कोणी कितीही मोठ्या घोषणा करूद्या. विजयाची येवढी खात्री असेल तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे धमक्या कोणाला देत आहेत. काल सोलापुरात उत्तम जानकरांच्या नावाने धमकी देण्यात आली. युतीचे काम करा अन्यथा तुरुंगात टाकू, मग तुम्हाला विजयाची एवढी खात्री आहे, मग धमक्या कशाला देत आहात”, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

“बारामती आणि शिरुर मतदारसंघात अजित पवार जाहीरपणे धमक्या देत आहेत. व्यापारी, उद्योजक हे सर्व काम करणारे लोक आहेत, त्यांना नोटीसा देणे, दंड आकारण्याच्या धमक्या देणं, मी बघून घेईल? या धमक्या कशाला देता, तुम्ही काय बघून घेता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल”, असा इशारा संजय राऊत यांनी महायुतीला दिला.

Story img Loader