काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल, असं सूचक वक्तव्य केलं आहे. तसेच कायद्याने ३० टक्के आरक्षण मिळणार नसेल, तर आम्ही मुली राजकारणात सहभागी होऊन ते मिळवू, असंही मत त्यांनी व्यक्त केलं. त्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो यात्रेत’ सहभागी झाल्या आहेत. यावेळी त्यांनी गुरुवारी (१७ नोव्हेंबर) एपीबी माझाशी बोलताना हे वक्तव्य केलं.

शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, “अनेक वर्षांपासून नेत्यांची मुलंच राजकारणात येत आहेत. मात्र, आता आमच्या पीढित नेत्यांच्या मुलीही राजकारणात येत आहेत. आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल, असं आम्हाला वाटतं. कारण कुठे ना कुठे आमच्यातील आत्मविश्वास वाढतो आहे.”

What Supriya Sule Said About Rohit Pawar ?
Supriya Sule : “रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शरद पवारांचा वारसा..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Inauguration of sculpture of Mahatma Phule and Savitribai Phule in Nashik
नाशिकमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम
मुल्ला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माजी खासदार पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला असून आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील यांच्यासह जमाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठाण मांडून बसला होते.
भाजपच्या माजी खासदारांकडून राष्ट्रवादी शरद पवार गटच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण, परस्पर विरोधी तक्रार
Due to lack of trust in Devendra Fadnavis and Chandrashekhar Bawankule department wise meetings of party leaders says Jayant Patil
फडणवीस, बावनकुळेंवर विश्वास नसल्याने दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या विभागनिहाय बैठका, जयंत पाटील यांचा चिमटा
ncp Vice President, Vishnu Mane, ncp,
राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षपदी विष्णू माने यांची निवड
There is no alternative to Ajit Pawar for the next 25 years says Nitin Patil
आगामी २५ वर्षे अजित पवारांना पर्याय नाही – नितीन पाटील
After Ajit Pawars visit NCP state general secretary resigned in Nagpur
अजित पवारांच्या दौऱ्यानंतर नागपुरात पक्षात पडझड, प्रदेश सरचिटणीसाचा राजीनामा

“आम्ही मुली राजकारणात येऊन ३० टक्के आरक्षण घेणार”

“काँग्रेस पक्ष महिला आरक्षणासाठी आधीपासून लढत आहे. लोकसभा आणि विधानसभेत किमान ३० टक्के आरक्षणाची आमची मागणी आहे. ते आरक्षण कायद्याने मिळणार नसेल तर मग आम्ही मुली राजकारणात येऊन या मार्गाने घेण्याचं आम्हा मुलींचं नियोजन सुरू आहे. त्यात यश आलं तर ते सर्व महिलांसाठी चांगलं ठरेल,” असं मत शिवानी वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.

“भारत जोडो यात्रेत मुलींसाठी सहजपणाचं वातावरण”

शिवानी वडेट्टीवार पुढे म्हणाल्या, “महिलांचा प्रतिसाद खूप वाढला आहे. हे बघून खूप आनंद होत आहे. माझ्यासोबत युवक काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या अनेक मुली आहेत. त्यांनी जबाबदाऱ्याही घेतल्या आहेत. भारत जोडो यात्रेत आम्ही रात्री एकत्र बसलो की आमच्या चर्चा होतात. भारत जोडो यात्रेत जसं सहजपणाचं वातावरण आहे तसं असलं की घरचेही पाठवायला मागेपुढे पाहत नाही. हे वातावरण काँग्रेस पक्ष देतो आहे आणि याचा मला अभिमान आहे.”

हेही वाचा : “जोपर्यंत महिला अशा लोकांचं ‘खेटरं पुजन’ करणार नाही, तोपर्यंत यांचा मेंदू…”, चित्रा वाघ यांचा वडेट्टीवारांवर हल्लाबोल

“भारत जोडो यात्रेत समानतेची अनुभूती”

“राजकारण म्हटलं की फक्त पुरुष आणि मुलं असं चित्र दिसायचं. त्यामुळे आधी मनात विचार यायचा की कार्यक्रमांना कसं जायचं, कोणाशी किती बोलायचं अशा अडचणी यायच्या. आता सहजपणा आला आहे. जितकी मुलं आहेत, तितक्याच मुली आहेत. त्यामुळे समानतेची अनुभूती होत आहे,” असंही शिवानी वडेट्टीवार यांनी नमूद केलं.