केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी सातत्याने शिवसेनेविरोधात टीका केल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलं आहे. या पार्श्वभूमवीर आज ठाकरे गटाचे सिंधुदुर्गातील आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळमध्ये मोर्चा काढण्यात आला. त्यांच्या चौकशीचा निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी बोलताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपावर आणि शिंदे गटावर तोंडसुख घेतलं. मात्र, यावेळी त्यांनी राणे पिता-पुत्रांची नक्कल करत त्यांना खोचक शब्दांत टोला लगावला. तसेच, नारायण राणेंचा त्यांनी ‘कोंबडीवाले’ असाही उल्लेख केला.

“भाजपाच्या घराघरात निरमा पावडरचा कारखाना”

नारायण राणेंवरील आरोपांचा संदर्भ देत भाजपाच्या घराघरात निरमा पावडरचा कारखाना झाल्याचं भास्कर जाधव म्हणाले. “या तुमच्या जिल्ह्यातले कोंबडीवाले. त्यांनी रे रोडला एक प्रकल्प उभा केला. त्यात ३०० कोटींचा भ्रष्टाचार केला. त्यांच्यावर ईडीची कारवाई व्हावी, म्हणून किरीट सोमय्यांनी तेव्हा आरोप केले होते. आज मंत्रीमंडळात बसलेले ५० टक्के लोक, मंत्रीमंडळाबाहेर आमदार असणाऱ्या लोकांवर भाजपाकडून असेच आरोप केले जात होते. पण तेच लोक भाजपात गेले आणि एकदम साफ, स्वच्छ झाले. भाजपाच्या घराघरात निरमा पावडरचा कारखानाच तयार झाला आहे”, असं भास्कर जाधव म्हणाले.

Mallikarjun Kharge reacts angrily to Neeraj Shekhar’s interruption in the Rajya Sabha with the comment "Tera baap mere saath tha!"
Mallikarjun Kharge : “गप्प खाली बस, मी तुझ्या बापाचाही…”, राज्यसभेत माजी पंतप्रधानांच्या मुलावर मल्लिकार्जुन खरगे संतापले
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
abhishek lodha and abhinandan lodha
व्यापारचिन्हाबाबतचा वाद मध्यस्थांमार्फत सोडवण्यास लोढा बंधुंची सहमती, माजी न्यायमूर्ती रवींद्रन यांची मध्यस्थी म्हणून नियुक्ती
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Pankaja Munde on Dhananjay Munde
“धनंजय मुंडे फडणवीस-पवारांचे खास, राजीनामा मागणार नाहीत”, क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर; म्हणाल्या…
Siddharth Jadhav
Video : सिद्धार्थ जाधवने ‘आई मला नेसव शालू नवा’ लावणीवर धरला ठेका; ‘तू ही रे माझा मितवा’फेम अभिनेत्याने दिली साथ, पाहा व्हिडीओ
Twinkle Khanna
“अक्षय कुमार असा लहान मुलगा…”, राजकीय विचारसरणी वेगळी असल्याच्या प्रश्नांवरून ट्विंकल खन्नाचा संताप, म्हणाली…

नितेश राणेंना टोला!

यावेळी नितेश राणेंचा एकेरी उल्लेख करत भास्कर जाधव यांनी त्यांना टोला लगावला आहे. “काल नितेश राणे चिपळूणमध्ये बोलताना माझ्यावर मनसोक्त टीका करून शेवटी म्हणतो ‘माझं एवढं भाषण ऐकल्यानंतर मी लिहून देतो भास्कर जाधव घरातून बाहेर पडणार नाही, घरात लपून बसेल’. मग आज इथे आलेली ही काय तुमची औलाद आहे का?” असं भास्कर जाधव म्हणाले.

“अजित पवार जर तेव्हा परत आलेच नसते…”, भास्कर जाधवांचं भाजपावर टीकास्र; ‘त्या’ घटनेचा केला उल्लेख!

नारायण राणेंची नक्कल

दरम्यान, यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी नारायण राणेंची नक्कल केली. “नारायण राणेंचं एकच कीर्तन असतं. ‘मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद दिलं आणि शिवसेना संपली’. आहो नारायण राणे.. शिवसेना संपली म्हणताय.. ३९ वर्ष शिवसेनेसाठी काम केलं म्हणता.. मग एवढी वर्षं काय दाढ्या करत होतात? तेव्हा अंधेरी-गोरेगावमध्ये म्हशींचे तबेले होते. शिवसेनेनं काहीच केलं नाही, तर ३९ वर्ष काम करून मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलेले तुम्ही काय म्हशी भादरत होता?” असा सवाल भास्कर जाधवांनी नारायण राणेंना केला आहे.

“संसदेत केरळचा प्रश्न विचारला की ते तामिळनाडूचं उत्तर द्यायचे. तामिळनाडूचा प्रश्न विचारला की हे केरळचं उत्तर द्यायचे. मग शेवटी ओम प्रकाश बिर्लांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर हे ‘हो’ म्हणतात”, असं म्हणत भास्कर जाधव यांनी राणेंचे हावभाव करून दाखवले. “पूर्वी नाथ पै किंवा मधू दंडवते बोलायला उभे राहिले, तर देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहातून जात असतील, तर ते पुन्हा येऊन बसायचे. आता हा बोलायला लागला की सगळे खासदार बाहेर होतात”, असंही जाधव यावेळी म्हणाले.

Story img Loader