शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेकांनी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच सरकारने महापुरुषांची बदनामी करणाऱ्या भिडेंना अटक करण्याची मागणी केली. यानंतर आता सत्ताधारी शिंदे गटातील एका नेत्यानीही भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करत कारवाईची मागणी केली आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, “संभाजी भिडेंनी अशी वादग्रस्त वक्तव्ये करू नये, असं माझंही मत आहे. ते दरवेळी काही तरी वादग्रस्त वक्तव्य करतात. माझ्या शेतातली आंबे खा म्हणजे पोरं होतात हा कोणता तर्क आहे. असं बोलणं योग्य नाही. संभाजी भिडेंचा कुणी सन्मान करत असेल, तर याचा अर्थ तोंडात येईल ते बोलणं योग्य नाही. मीही त्यांचा निषेध करतो.”

rohit pawar criticized devendra fadnavis
Rohit Pawar : “गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन…”; पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
uddhav thackeray criticized mahayuti government
न्यायदेवतेवर विश्वास पण दोन वर्षे न्याय मिळाला नाही! उद्धव ठाकरे यांची खंत
Ladki bahin yojana BJP workers meeting Marathwada
‘लाडक्या बहिणीं’चे भाजपकडून तीन हजार मेळावे
ujjwal nikam on akshay shinde encounter
“या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी नक्कीच होईल, कारण…”; अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी उज्वल निकम यांची प्रतिक्रिया!
Anyone embezzling in Anand Dighe's ashram should be thoroughly investigated
आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
gujrat bjp corporator allegation of misbehave
Gujarat : भाजपाच्या नगरसेविकाचा पक्षातील नेत्यावरच गंभीर आरोप; म्हणाल्या, “त्यांनी माझा हात पकडला अन् व्यासपीठावरून…”

“समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे”

“मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही सांगणार आहे की, अशी वारंवार वक्तव्ये करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर एकदा तरी कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी संजय शिरसाटांनी केली.

हेही वाचा : संभाजी भिडेंना फाशी देणार का? नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल; म्हणाले

“ज्याला देशातून तडीपार केलं पाहिजे त्याला द्वेषपूर्ण भाषणाची मुभा”

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या, “आम्ही आंदोलन केलं तर आम्हाला अटक करायला हे तयार आहेत. मात्र, ज्याला देशातून तडीपार केलं पाहिजे त्या नालायक माणसाला द्वेषपूर्ण भाषण देण्याची मुभा आहे. हे कोणतं राजकारण आहे आणि हा शासन चालवण्याचा कोणता प्रकार आहे.”

“भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन अटक झाली नाही, तर…”

“आम्ही रविवारपर्यंत (३० जुलै) शांत बसू. तोपर्यंत संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन अटक झाली नाही, तर आम्ही आंदोलन छेडू. तेव्हा ते आम्हाला थांबवू शकणार नाहीत,” असा इशारा यशोमती ठाकूर यांनी सरकारला दिला.

हेही वाचा : “संभाजी भिडे बोलले ते इतकं…”, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींना भावना अनावर; म्हणाले, “मला खरी चिंता…!”

“संभाजी भिडे भाजपाचे प्राथमिक सदस्यही नाहीत”

नाना पटोलेंच्या टीकेवर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “नाना पटोलेंनी जरा अभ्यास करून बोललं पाहिजे. संभाजी भिडे वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. ते भाजपाचे प्राथमिक सदस्यही नाहीत आणि कुठल्याही पदावरही नाही. त्यामुळे संभाजी भिडेंचा संबंध भाजपाशी जोडणे योग्य नाही.”

“भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करणे सरकारची जबाबदारी”

“संभाजी भिडेंनी जे वक्तव्य केलं आहे त्याची चौकशी करणे सरकारची जबाबदारी आहे. त्या वक्तव्याचा काही विपर्यास झाला आहे का त्याची सरकार चौकशी करेल आणि योग्य विचार करेल,” असं मत बावनकुळेंनी व्यक्त केलं.