शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शरद सहकारी साखर कारखान्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून आपल्याकडे त्याबाबतचे सर्व पुरावे आहेत, असा दावा दानवे यांनी केला आहे. यामुळे अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे आमने-सामने आले आहेत.

दानवे यांच्या आरोपानंतर भुमरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. अंबादास दानवेंनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना भुमरे म्हणाले की, शरद सहकारी साखर कारखाना गेल्या १२ वर्षांपासून बंद पडला होता. तो कारखाना आम्ही सुरू केला. याचा त्रास आम्हाला आजही होत आहे. तो कारखाना गेल्या १२ वर्षांपासून बंद पडला होता. त्यामुळे तो कारखाना भंगार झाला होता. तो कारखाना शेतकऱ्यांसाठी सुरू केला. अशा ठिकाणी मनी लॉंडरिंग कसं काय चालू शकतं? तिथे काही मनी लॉंडरिग होत असेल तर त्याचा तपास करावा.

Rajendra Raut protest started in Barshi on reservation issue solhapur
सोलापूर: आरक्षणप्रश्नी राजेंद्र राऊत यांचे बार्शीत ठिय्या आंदोलन सुरू
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Sanjay Raut
Sanjay Raut : “संकेत बावनकुळेंच्या गाडीमध्ये दारूसह बीफ कटलेटची बिले आढळली”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, “भाजपाने हिंदुत्व..”
Rajendra Raut, Manoj Jarange patil ,
मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून आघाडीला सत्तेत आणण्याचा डाव, आमदार राजेंद्र राऊत यांचा पुन्हा हल्ला
aditya thackeray
Aditya Thackeray : “मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही”, म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला; म्हणाले…
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
amol mitkari on tanaji sawant
Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”
Rajendra Raut, Manoj Jarange,
सोलापूर : ओबीसीतून मराठा आरक्षणप्रश्नी पवार, ठाकरे, पटोलेंच्या सह्या आणा; राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगे यांना आव्हान

हेही वाचा- “…नाहीतर नीलम गोऱ्हे आज शिवसेनेत नसत्या”, नारायण राणेंच्या या विधानावर नीलम गोऱ्हे हसून म्हणाल्या, “मला वाटतं चिंटूचे जोक…”

“अंबादास दानवेंना सध्या काही कामं नाहीत. त्यांना संदीपान भुमरेशिवाय दुसरं कुणी दिसत नाही. त्यांनी विकासावर बोलावं मग आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. आणि या कारखान्यात काय गैरव्यवहार झाला आहे? हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं” असं आव्हान संदीपान भुमरे यांनी दिलं आहे.

अंबादास दानवेंनी नेमके आरोप काय केले?

संदीपान भुमरेंना उद्देशून केलेल्या आरोपांत अंबादास दानवे म्हणाले, “तुम्ही शरद सहकारी साखर कारखाना कशा पद्धतीने चालवता, हे आम्हाला माहीत आहे. हा कारखाना कुणालाही चालवायला दिला नाही, तरीही या कारखान्यातून मनी लॉंडरिंगचा प्रकार सुरू आहे. निश्चितच याचे सर्व पुरावे काही दिवसांत बाहेर येतील. या कारखान्यात कुणाचा पैसा येतो आणि कुणाला पैसा दिला जातो. कारखान्यातील साखर कोण विकतं आणि साखर कोण खरेदी करतं, याचा सगळा तपशील माझ्याकडे आहे. हा तपशील मी इथेच सांगणार नाही. पण हा तपशील एक दिवस सभागृहात मांडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही.” असा इशारा दानवेंनी दिला आहे.