मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार घटनाबाह्य ठरवण्यासह अन्य बाबींना आव्हान देणाऱ्या चार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. उद्या ११ जुलै रोजी यावर सुनावणी होणार आहे. याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. शिंदे गटाने अन्य पक्षात विलीनीकरण न केल्याने तेच मूळ पक्ष होऊ शकतात का? नसल्यास ते अपात्र ठरणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर उद्याच्या सुनावणीवर अवलंबून आहेत.

उद्या सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. या चर्चेला सुभाष देसाई, अरविंद सावंत आणि संजय राऊत हे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयीन लढाईत शिवसेना कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

lavasa loksatta news,
लवासा प्रकरण : सीबीआय चौकशीची मागणी कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Mumbai High Court dismissed a petition demanding an ED inquiry against Valmik Karad.
वाल्मिक कराडच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या ईडी चौकशीची मागणी; न्यायालयाने प्रश्न उपस्थित करून याचिका फेटाळली
petitionin Bombay HC against Aditya Thackeray
दिशा सालियन मृत्यू प्रकरण: आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची याचिका का ऐकावी ? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा
Supreme Court On Mahakumbh Stampede
Supreme Court : “ही दुर्दैवी घटना, पण…”, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार, याचिकाकर्त्याला दिले ‘हे’ आदेश
Delhi Assembly election 2025 Yamuna pollution issue in campaign in Delhi
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आरोपांची राळ; दिल्लीत यमुनेच्या प्रदूषणाचा मुद्दा केंद्रस्थानी
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Rajnath singh and pannun
Pannun Threat Rajnath Singh : खलिस्तान समर्थक पन्नूकडून थेट भारताच्या संरक्षण मंत्र्यांना धमकी, थेट शासकीय निवासस्थानी केला फोन!

हेही वाचा- “संजय राऊत हे शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादीत”, दीपक केसरकरांचा पुन्हा हल्लाबोल

माध्यमांशी बोलतना राऊत यांनी म्हटलं की, “कायदेशीर लढाईत शिवसेना कुठेही कमी पडणार नाही. आम्हाला माहीत आहे, कुणावर कसे दबाव सुरू आहेत. कायद्याची कशी पायमल्ली सुरू आहे. देशात लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न मिनिटा-मिनिटाला होतोय. पण उद्या अकरा तारीख आहे. सर्वोच्च न्यायालयामधील महत्त्वाच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष लागलं आहे. देशात लोकशाही आणि न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की नाही, हे उद्याच्या निकालावरून कळेल,” असंही राऊत म्हणाले.

हेही वाचा- “बंडखोरीसाठी ५० कोटी घेतले”; राऊतांच्या आरोपाला अब्दुल सत्तारांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…

शिवसेना पक्षाला लागलेल्या गळतीबाबत बोलताना ते म्हणाले की, “मातोश्रीवर दररोज १५-१५ तास बैठका सुरू आहेत. शिवसेनेतला प्रत्येक विभाग आणि जिल्ह्यातील कार्यकारणी मातोश्रीवर येत आहे. आम्ही त्यांना भेटत आहोत, चर्चा करत आहोत. शिवसेना जागेवरच आहे. शिवसेना, शिवसैनिक आणि शिवप्रेमी जनता आहे तिथेच आहे. कारण ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. मातोश्री, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना आमच्यासाठी आई आहे. आम्ही आईसोबत गद्दारी करू शकत नाही, बेईमानी करू शकत नाही. मुंबई आणि महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिकांसोबत मातोश्रीचं जे नातं आहे, ते अतूट आहे. त्याला कुणीही तोडू शकत नाही,” असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Story img Loader