Amol Khatal On Balasaheb Thorat : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. या निकालात महायुतीला मोठं यश मिळालं, तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महायुतीला तब्बल २०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे आता राज्यात महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होईल. पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष, शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. यामध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचाही संगमनेर मतदारसंघामधून पराभव झाला. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ हे निवडून आले. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांचा पराभव करत मोठ्या मताधिक्यांनी विजयी झालेले अमोल खताळ यांची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज अमोल खताळ यांनी त्यांच्या विजयामागची कारणं काय? याबाबत भाष्य केलं आहे.

अमोल खताळ काय म्हणाले?

“संगमनेरमध्ये मोठी दहशत सुरु होती. त्या दहशतीचा बंदोबस्त करण्यासाठी लोक अनेक दिवसांपासून अपेक्षा ठेवून आमच्याकडे पाहत होते. तसेच महायुतीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे मला यश मिळालं. आता बाहेरच्या लोकांना यावर विश्वास बसत नाही. कारण संगमनेरमध्ये सुसंस्कृत नेते आहेत असं अभासी चित्र निर्माण केलं गेलं होतं. मात्र, मतदारसंघातील जनतेने यावेळी निर्धार केला होता की या निवडणुकीत परिवर्तन करायचं. त्यामुळे बाहेरच्या लोकांसाठी हे अनपेक्षित आहे”, असं अमोल खताळ यांनी म्हटलं.

Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
Dhananjay Munde on Namdev Shastri Maharaj
Dhananjay Munde : महंत नामदेव शास्त्री महाराजांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर धनंजय मुंंडेंनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “इतकी मोठी शक्ती…”
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?
Pankaja Munde on Dhananjay Munde
“धनंजय मुंडे फडणवीस-पवारांचे खास, राजीनामा मागणार नाहीत”, क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर; म्हणाल्या…
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

हेही वाचा : “हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे”, विधानसभेत हरल्यानंतर अमित ठाकरे पुन्हा सक्रिय; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत!

“माझी विधानसभा निवडणूक लढवायची म्हणून तयारी नव्हती. पण एका मोठ्या व्यक्ती विरोधात किंवा एका मोठ्या प्रवृत्तीच्या विरोधात आमचा लढा सुरु होता. मात्र, आम्हाला योग जुळून येत नव्हता. पण महायुती सरकारने कितीतरी लोक कल्याणकारी योजना आणल्या त्यामुळे आम्हाला लोकांच्या घरी जावून ते काम लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. तेव्हा आम्हाला जाणवलं की संगमनेरमध्ये मोठी दहशत आहे. त्यानंतर आम्ही त्यावर काम करायला सुरुवात केली. तसेच लोकांना विश्वास दिला की या ठिकाणी विरोधक देखील सक्षम आहेत. त्या विश्वासाला जनतेने देखील साथ दिली”, असं निवडणुकीच्या यशामागचं कारण अमोल खताळ यांनी सांगितलं.

“खरं तर संगमनेरमध्ये सुरु असलेली दहशत आणि दादागिरी लोकांना आवडेली नाही. वसंत देशमुखांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ धांदरफळमध्ये जी घटना घडली. मात्र, ती घटना घडली नसती तरी देखील आमच्यावर हल्ला करण्याची योजना होती. मात्र, त्या घटनेनंतर जनतेने त्यांची दहशत संपवण्यासाठी पुढाकार घेतला”, असं म्हणत नाव न घेता आमदार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.

Story img Loader