महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही घोषणा गुढीपाडवा मेळाव्यात केली. राज ठाकरेही महायुतीमध्ये सहभागी झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी टीका केली आहे. ‘मनसेने महायुतीला पाठिंबा दिला की, द्यायला लावला याचा शोध घेणे गरजेचे आहे’, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला आहे.

भास्कर जाधव काय म्हणाले?

“मनसेने पाठिंबा दिला की द्यायला लावला याचा शोध घेणे गरजेचे आहे. मात्र, मनसेच्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो, तुम्ही मुळचे शिवसैनिक आहात. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे तुम्ही शिवसैनिक आहात. त्यामुळे मनसेच्या नेत्यांनी काय निर्णय घेतला, तो निर्णय त्यांना घेऊद्या. परंतु मी मनसैनिकांना जाहीरपणे आवाहन करतो की, आपण उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे रहा आणि उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करा”, असे भास्कर जाधव म्हणाले.

Namdev Shastri Maharaj kirtan on Bhandara mountain postponed
पिंपरी : नामदेव महाराज शास्त्री यांचे भंडारा डोंगरावरील कीर्तन रद्द
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Man gets life sentence for pouring kerosene on wife and setting her on fire
पुणे : पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणाऱ्या एकाला जन्मठेप
Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Hasan Mushrif statement on Kolhapur boundary extension in marathi
कोल्हापूर हद्दवाढीत लोकप्रतिनिधीच आडवे; हसन मुश्रीफ यांचे टीकास्र
dcm eknath shinde slams sharad pawar for his statement
विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर; एकनाथ शिंदे यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल

हेही वाचा : Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन

भास्कर जाधव यांच्या या टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपरकर यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. ‘भास्कर जाधव आम्हाला तुमची दया येते. राज ठाकरे यांची टाळी कधी पाहिली आहे का? आम्हाला आता उद्धव ठाकरे यांची कीव येते आणि कोत्या मनोवृत्तीची चीड येत आहे’, असे अमेय खोपरकर म्हणाले आहेत.

भाजपचा सर्व्हे बाहेर कसा आला?

भास्कर जाधव यांनी भाजपावरही टीका केली. ते म्हणाले, “विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही आलो आहोच. गद्दारांच्या विरोधात लढण्यासाठी हा जनसागर आहे. महाविकास आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विनायक राऊत यांची लोकप्रियता जनसमान्यांत आहे. भाजपाने वीस आणि नंतर तीन जागा जाहीर केल्या. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जागा जाहीर करण्याची वेळ आल्यावर सर्व्हेचे नाटक पुढे केले गेले. अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वासघात केला आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्या जागा जाहीर करताना भाजपाचा सर्व्हे बाहेर कसा आला?”, असा प्रश्न भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.

Story img Loader