गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांच्या घरी आणि कार्यालयात ईडी आणि सीबीआयने छापेमारी केली आहे. काही नेत्यांना अटक झाली असून ते तुरुंगात देखील आहेत. ईडी किंवा सीबीआयच्या छापेमारीचा त्रास होतो का? असा सवाल विचारला असता संजय राऊत यांनी हटके उत्तर दिलं असून एक घटनाक्रम सांगितला आहे. संजय राऊत यांच्या जवळच्या व्यक्तींच्या घरी धाडी पडल्यानंतर संजय राऊतांनी थेट केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता.

पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. नेहमी तुमच्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यावरच धाडी पडतात. भाजपाच्या नेत्यांवर धाडी पडत नाही. याचा तुम्हाला त्रास होत नाही का, असा प्रश्न सूत्र संचालकाने संजय राऊत यांना विचारला होता. संबंधित प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की,‘त्रास म्हटलं तर होतो. परंतु, तो करून घ्यायला नको. याचं आम्ही २०२४ नंतर उत्तर देऊ. सगळ्यांचे दिवस येतात. आमचे पण दिवस येतील.’

Tahawwur Hussain Rana extradited to India
२६/११ हल्ल्यापूर्वी १५ दिवस तहव्वूर राणा मुंबईत; हेडलीच्या दोन ईमेलने कटातील सहभागाचा उलगडा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? स्वतः सैफनेच पोलिसांना सांगितलं; जबाबात म्हणाला, “मी हल्लेखोराला…”
Sanjay Nirupam on Saif Ali Khan
Sanjay Nirupam: अडीच इंचाचा चाकू घुसल्यावरही सैफ अली खान पाच दिवसात फिट कसा? संजय निरुपम यांचा सवाल
Uday Samant on Eknath Shinde
Sanjay Raut: “एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीसांना नकोसे, लवकरच मोदींना…”, संजय राऊत यांचा दावा
sanjay raut
Sanjay Raut : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया, “राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी…”
Sanjay Raut on uday Samant
“एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच ‘उदय’ होणार होता”; संजय राऊतांच्या विधानाने खळबळ; राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता?
Sanjay Raut on saif ali khan (1)
Sanjay Raut : “सैफ आणि करीना लव्ह जिहादचे प्रतिक होते अन् आता…”, संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं!

त्यांनी पुढे म्हटलं की, “ईडीने माझी नसलेली संपत्ती जप्त केली. मी ज्या घरात राहतो ते घर आणि माझी वडिलोपार्जित ४०-४५ गुंठे जमीन आहे. ती जमीन कोणतीही नोटीस न देता जप्त केली. तसेच ते मला रोज अटक करणार असल्याच्या धमक्या देतात. मी त्यांना निरोप दिला. मी बसलोय, कधी अटक करताय?

“ज्यादिवशी माझ्या जवळच्या व्यक्तींच्या घरी धाडी पडल्या, तेव्हा मी रात्री बारा वाजता गृहमंत्री अमित शाहांना फोन केला होता. मी दिल्लीत बसलोय, माझ्यासाठी त्या गरीब लोकांना का त्रास देताय? मला अटक करा. मी फोन करून त्यांना सांगितलं आम्ही घाबरत नाही,” असंही राऊत म्हणाले.

Story img Loader