एक वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचा निर्णय दिला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेना ( ठाकरे गट ) सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. पण, खरी शिवसेना कोणाची यावरून भाजपा आमदार आशिष शेलार आणि आमदार भास्कर जाधव यांच्यात विधानसभेत जुंपल्याचं पाहायला मिळालं.

“उबाठा शिवसेना वगैरे काही नाही. शिवसेना एकच आहे,” असं आशिष शेलार यांनी म्हटलं. याला प्रत्युत्तर देताना शिवसेना आमच्याकडेच असल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला.

NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
Domastic Violence Laws In India
“आम्ही काहीही करू शकत नाही”, हुंडा व घरगुती हिंसाचार कायद्यांच्या गैरवापराविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
MLA hemant Rasane treatment Guillain Barre syndrome patients
गुइलेन बॅरे सिंड्रोम रुग्णांवर उपचारांसाठी आमदार रासने यांची मोठी मागणी, म्हणाले…!
bombay HC slaps Rs 1 lakh cost on ED for case on realtor
विकासकावर खोटा खटला; पुराव्यंशिवाय कारवाई, न्यायालयाचे ताशेरे

आशिष शेलार म्हणाले, “विधानसभेत उबाठा शिवसेना अशा पक्षाने काही नोंदणी केली आहे का? कारण, निवडणूक आयोगाने शिवसेना एकच असल्याचं सांगितलं आहे. मग, उबाठा शिवसेना कुठे आहे? उबाठा शिवसेना पक्षाची नोंदणी केली का? त्यांना मान्यता दिली का? गटनेता, प्रतोद आणि प्रतिनिधित्व ठरवलं आहे का? उबाठा शिवसेना अदृष्य आहे.”

हेही वाचा : “विधानसभेत उबाठा शिवसेना अशा पक्षाने काही नोंदणी केली आहे का? कारण…”, असेही आशिष शेलार यांनी म्हटलं.

“उबाठा शिवसेना वगैरे काही नाही. शिवसेना एकच आहेत, ती तुमच्यासमोर निर्णयासाठी आली आहे. दुसरी कोणती शिवसेनाच नाही आहे. त्यामुळे समान संधी आणि समान न्यायावर निर्णय घ्यावा,” असे आवाहन आशिष शेलार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना केलं.

यावर भास्कर जाधव चांगलेच संतापले. “निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला, त्याचा सभागृहाशी काही संबंध नाही. सर्वोच्च न्यायालयाने मुख्य प्रतोद सुनील प्रभू असून भरत गोगावले नसल्याचं सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोग आणि आशिष शेलार मोठे नाहीत. मूळ शिवसेना ही आमच्याकडेच आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेबरोबर जे चाललं आहे, ते लोकशाही संपवण्याचं काम आहे,” अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी सुनावलं आहे.

Story img Loader