मागील जवळपास आठ महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. न्यायालयातील ही सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. दरम्यान, देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बाजू मांडली.

राज्यपाल कोश्यारी यांची बाजू मांडताना तुषार मेहता यांची अनेकदा गडबड आणि तारांबळ झाली. न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही त्यांना देता आली नाहीत. यावेळी न्यायालयात नेमकं काय घडलं? याबाबतचा सर्व घटनाक्रम कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सांगितला आहे.

beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
scam in hoardings revenue in palghar news update
शहरबात : बॅनरचे उत्पन्न गेले कुठे?
SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
congress leader vijay wadettiwar reacts on criminal in santosh deshmukh murder case
“संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना पाठीशी घालणारे नालायक…”, वडेट्टीवार यांची टीका
Supreme Court On Mahakumbh Stampede
Supreme Court : “ही दुर्दैवी घटना, पण…”, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार, याचिकाकर्त्याला दिले ‘हे’ आदेश
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

हेही वाचा- ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी मंत्र्याचा शिंदे गटात प्रवेश

‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना असीम सरोदे म्हणाले, “तुषार मेहता यांच्या बुद्धीमत्तेबद्दल मला आदर आहे. पण प्रकरणात त्यांनी आवश्यकता नसताना खूप जास्त बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांना बोलण्याचा स्कोप नसतानाही ते पोटतिडकीने राज्यपालांची बाजू मांडत होते. कदाचित कुणीतरी त्यांना असाच युक्तिवाद करायचा, असं सांगितलं असावं. त्यामुळे जे खोटं आणि घटनाबाह्य वागले आहेत. ज्यांनी अनेकदा असंविधानिक नैतिकता अस्तित्वात आणली. असे महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बाजू मांडताना, तुषार मेहता यांची गडबड आणि तारांबळ उडाल्याचं न्यायालयात पाहायला मिळालं.”

हेही वाचा- “देश का PM कैसा हो, शरद पवार जैसा हो”; NCPच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देताच उद्धव ठाकरे म्हणाले, “आधी गावपातळीवर…”

“जेव्हा न्यायाधीशांनी तुषार मेहता यांना प्रश्न विचारले, तेव्हा त्यांना उत्तरं देता येत नव्हती. बाजुला विरोधी पक्षासह त्यांच्या बाजुचे वकीलही झोपले होते. हे पाहून तुषार मेहता स्वत: म्हणाले, ‘मला दिसतंय की सगळ्यांना कंटाळा येत असेल पण माझ्याकडे उपाय नाही. मला हे वाचून दाखवावंच लागेल.’ मेहतांचं हे विधान फार महत्त्वाचं आहे. अशावेळी मला वाटतं की, आपण नेमकेपणाने युक्तिवाद करू शकत नाही. कारण आपली बाजू कमजोर असते. अशावेळी आपल्याला खूप जास्त वाचन करावं लागतं, हेच तुषार मेहतांबरोबर दुर्दैवाने आज न्यायालयात झालं,” अशी माहिती असीम सरोदे यांनी दिली.

Story img Loader