सरकार माझ्या जीवाशी खेळत असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सूडबुद्धीने कारवाई करत सुरक्षा काढली जात असून, सत्ताधारी नेत्यांना दिली जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी सुरक्षा काढण्यास सांगणारी अशी कोणती कमिटी आहे? अशी विचारणाही केली.

तुमच्या घराची अज्ञातांकडून रेकी केली जात असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊत म्हणाले की “मला पोलीस, गुप्तचर यंत्रणांकडूनही यासंबंधी कळलं आहे. गेल्या २५ ते ३० वर्षं, मुंबईच्या दंगलीपासून सुरक्षाव्यवस्था होती. पण या सरकारने सर्व सुरक्षा काढून घेतली आहे. आम्ही पुन्हा सुरक्षा मागितलेली नाही, आणि मागणारही नाही”.

Reasons behind the failure of Modi government multi crore oilseeds scheme Pune news
मोदी सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या तेलबियांच्या योजना फसल्या; जाणकारांनी सांगितली अपयशाची कारणे…
Daily Horoscope 12th October 2024 Rashibhavishya in Marathi | dasara 2024
१२ ऑक्टोबर पंचांग: दसऱ्याला मीनसह ‘या’ राशींवर धन-सुखाची…
reason behind celebration of wildlife week
विश्लेषण : वन्यजीव सप्ताह हा आता इव्हेंट झाला आहे का?
Devendra Fadnavis on nitin gadkari
“अनुदानाची शाश्वती नाही, लाडकी बहीणसाठी पैसे द्यावे लागतात”, नितीन गडकरींच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
Narendra Modi statement that the people of Kashmir are waiting for a terror free government print politics news
काश्मिरी जनतेला दहशतवादमुक्त सरकारची प्रतीक्षा – मोदी
Improved Energy Levels doctor suggest some hacks
Improved Energy Levels : ऊर्जा, तणाव, झोप ‘या’ गोष्टींवर नियंत्रण कसं ठेवाल? फक्त हे तीन उपाय करा; समजून घ्या डॉक्टरांचा सल्ला…
rahul gandhi on sebi
“छोट्या गुंतवणूकदारांचे १.८ लाख कोटी रुपये लुटणारे…”; राहुल गांधींचा पुन्हा सेबीवर हल्लाबोल; म्हणाले…
nitin gadkari
Nitin Gadkari : “राजाने विरोधी विचार सहन केले पाहिजेत हीच लोकशाहीची परीक्षा”, नितीन गडकरींचा रोख कुणाकडे?

“मी ‘सामना’ कार्यालय, शिवसेना भवनात बसलेलो असताना तसंच जेलमध्ये जाताना किंवा घरी येताना याच कारणामुळे पोलिसांची सुरक्षा दिली जात होती. काहीतरी होऊ शकतं याची माहिती असतानाही सरकारने सुरक्षा काढली आहे. याचा अर्थ सरकार माझ्या जीवाशी खेळत आहे. पण काही झालं तरी मी सरकारकडे सुरक्षा मागणार नाही,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

पाहा व्हिडीओ –

कर्नाटक सरकार सांगलीतील ४० गावांवर दावा करण्याच्या तयारीत, संजय राऊत संतापले, म्हणाले “शिंदे सरकारमुळे राजकीय दरेडोखोरांना…”

पुढे ते म्हणाले की “कोणत्या नियमाने आणि भूमिकेतून ही सुरक्षा काढण्यात आली? अशी कोणती कमिटी आहे ज्यांनी एका क्षणात सर्वांची सुरक्षा काढली आणि सत्ताधारी लोकांना दिली. यासंबंधी जनतेच्या मनात काही शंका आणि प्रश्न आहेत. आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर हे सरकार जबाबदार असेल. आमच्यावर हल्ले व्हावेत, दवाबाखाली राहावं यासाठी सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. पण तसं काही होणार नाही”.