सरकार माझ्या जीवाशी खेळत असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सूडबुद्धीने कारवाई करत सुरक्षा काढली जात असून, सत्ताधारी नेत्यांना दिली जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी सुरक्षा काढण्यास सांगणारी अशी कोणती कमिटी आहे? अशी विचारणाही केली.

तुमच्या घराची अज्ञातांकडून रेकी केली जात असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊत म्हणाले की “मला पोलीस, गुप्तचर यंत्रणांकडूनही यासंबंधी कळलं आहे. गेल्या २५ ते ३० वर्षं, मुंबईच्या दंगलीपासून सुरक्षाव्यवस्था होती. पण या सरकारने सर्व सुरक्षा काढून घेतली आहे. आम्ही पुन्हा सुरक्षा मागितलेली नाही, आणि मागणारही नाही”.

Sanjay Raut Answer to Sanjay Shirsat
Shivsena : शिवसेनेचे दोन संजय, रेड्याची शिंगं, कुंभमेळा चेंगराचेंगरी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
devendra bhuyar marathi news
अजित पवारांच्या पक्षाचा माजी आमदार म्हणतो, “अर्थसंकल्प भ्रमनिराश करणारा!”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”

“मी ‘सामना’ कार्यालय, शिवसेना भवनात बसलेलो असताना तसंच जेलमध्ये जाताना किंवा घरी येताना याच कारणामुळे पोलिसांची सुरक्षा दिली जात होती. काहीतरी होऊ शकतं याची माहिती असतानाही सरकारने सुरक्षा काढली आहे. याचा अर्थ सरकार माझ्या जीवाशी खेळत आहे. पण काही झालं तरी मी सरकारकडे सुरक्षा मागणार नाही,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

पाहा व्हिडीओ –

कर्नाटक सरकार सांगलीतील ४० गावांवर दावा करण्याच्या तयारीत, संजय राऊत संतापले, म्हणाले “शिंदे सरकारमुळे राजकीय दरेडोखोरांना…”

पुढे ते म्हणाले की “कोणत्या नियमाने आणि भूमिकेतून ही सुरक्षा काढण्यात आली? अशी कोणती कमिटी आहे ज्यांनी एका क्षणात सर्वांची सुरक्षा काढली आणि सत्ताधारी लोकांना दिली. यासंबंधी जनतेच्या मनात काही शंका आणि प्रश्न आहेत. आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर हे सरकार जबाबदार असेल. आमच्यावर हल्ले व्हावेत, दवाबाखाली राहावं यासाठी सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. पण तसं काही होणार नाही”.

Story img Loader