शिवसेनेत पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण रंगू लागलं आहे. ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका करतानाच शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप शरद पवार आणि अजित पवारांवर केला. या आरोपांची सध्या जोरदार चर्चा सुरू असतानाच आता शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या सूचक ट्वीटची चर्चा सुरू झाली आहे. याआधी देखील संजय राऊतानी शायरीच्या माध्यमातून सूचक शब्दांत केलेल्या ट्वीटची अशीच चर्चा रंगली होती.

काय आहे ट्वीटमध्ये?

संजय राऊतांनी ट्वीटमध्ये सूचक शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. रामदास कदम यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर या ट्वीटची चर्चा केली जात आहे. या ट्वीटमध्ये संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी एक शेर ट्वीट केला आहे.

Sanjay Raut Answer to Sanjay Shirsat
Shivsena : शिवसेनेचे दोन संजय, रेड्याची शिंगं, कुंभमेळा चेंगराचेंगरी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती

“अजित पवारांचा एक कलमी कार्यक्रम होता, सकाळी ७ वाजता…”, शिवसेनेतून हकालपट्टीनंतर रामदास कदम यांचं टीकास्त्र!

“पीठ से निकले खंजरों को गिना जब, ठीक उततने ही थे, जितनों को गले लगाया था…जय महाराष्ट्र”, असं या ट्वीटमध्ये संजय राऊतांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले रामदास आठवले?

आज दिवसभर रामदास आठवले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांची चर्चा सुरू होती. “बाळासाहेब आजही माझ्यासमोर दिसत आहेत. ही वेळ आमच्यासारख्यांवर का यावी? याचा विचार उद्धव ठाकरेंनी करायला हवा. किमान त्यांनी काल मला फोन करून सांगायला हवं होतं की या इथे आपण बोलुयात. कुणाची हकालपट्टी करताय? आमच्या मेहनतीवर तुम्ही तिथे खुर्चीवर बसला आहात. आम्ही सगळं उभं केलंय”, असं कदम यावेळी म्हणाले आहेत. तसेच, शरद पवार आणि अजित पवारांनी शिवसेना फोडली, असा आरोप देखील रामदास कदम यांनी केला आहे.

Story img Loader