शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत महाराष्ट्र भाजपा सहभागी आहे. वीर सावरकरांचा अपमान झाला म्हणून संपूर्ण काँग्रेसला व गांधी परिवारास गुन्हेगार ठरवणारे शिवरायांचा अपमान हा एखाद्याचे वैयक्तिक मत आहे, असे सांगतात. हा पळपुटेपणा आहे, असं म्हणत शिवसेनेनं सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीकाकेली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी मराठावाडा विद्यापीठातील कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी केल्याच्या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपादक असलेल्या ‘सामना’मधून राज्यपालांना माफी मागावीच लागेल असं म्हटलं आहे. तसेच राहुल गांधींनी सावरकरांसंदर्भात केलेल्या विधानावरुन जोडे मारो आंदोलन करणाऱ्यांनी तेच जोडे स्वत:च्याच कानाखाली मारण्याची वेळ आल्याचा टोलाही लगावला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा