ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये भाजपाला आणि महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गट यांची २३५९ पैकी १३७२ ग्रामपंचायतींवर सत्ता आली आहे. भाजपाकडून जल्लोष सुरु आहे. अशात संजय राऊत यांनी अनाडी लोकांच्या हाती राज्य गेलं आहे अशा शब्दांत टीका केली आहे.

काय आहे संजय राऊत यांची X पोस्ट?

काळ मोठा कठीण आला आहे.
राज्य अनाडी लोकांच्या हाती गेले आहे. ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा दावा बरेच गटतट करीत आहेत.या निवडणुका पॅनल पद्धतीने लढवल्या जातात. पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हीच जिंकलो हा दावा पोकळ आहे. जे लोक विद्यापीठाच्या सेनेट निवडणुका घेण्यास घाबरतात. मुंबईसह १४ महानगर पालिकांच्या निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते.ते ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा गुलाल उधळत आहेत. याला काय म्हणावं? हास्य जत्राच!

shiv sena bjp conflict over regularizing construction built by project victims in navi mumbai and panvel
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर नवी मुंबईत महायुतीतच धुसफुस ?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
west bengal governor ananda boase on mamata banerjee
Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी ममता बॅनर्जींवर टाकला बहिष्कार; म्हणाले, “इथून पुढे मी त्यांच्याबरोबर…”!
rohit pawar on ajit pawar confession
Rohit Pawar : “ज्या पक्षाने कुटुंब फोडलं, त्यांना…”; अजित पवारांच्या ‘त्या’ कबुलीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया!
MPSC, autonomy MPSC, Interference MPSC, satej patil
पुणे: एमपीएससीच्या स्वायत्ततेतील हस्तक्षेपावर सतेज पाटील यांची टीका, म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ…’
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
amol mitkari on tanaji sawant
Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”
supreme court on governor marathi news
चतुःसूत्र: राज्यपाल न्यायिक पुनरावलोकनाच्या कक्षेत

असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर आणि महायुतीवर टीका केली आहे. या निवडणुका पॅनल पद्धतीने होतात. गावाच्या विकासासाठी या निवडणुका होतात. अडाणी घोडे सध्या उधळले आहेत. आम्हीच जिंकलो असं म्हणत आहेत. मात्र मुख्यमंत्री एकच टेप वाजवत आहेत. मात्र त्यामुळे जनमत त्यांच्या बाजूने होणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सरकारला आकडा लावायची सवय आहे. ४० खोके, ५० खोके. त्यांनी काहीही आकडा लावला तरीही काही फरक पडत नाही. ग्रामपंचायत निवडणुका चिन्ह आणि पक्षांवर लढवल्या जात नाहीत. हे सरकार सिनेट निवडणूक घ्यायला घाबरतं आहे. त्यांनी हा दावा करणं हास्यास्पद आहे असंही राऊत म्हणाले आहेत.