सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे शेतीच्या कामांना वेगाने सुरुवात झाली आहे. पण सम्राट खताच्या टंचाईमुळे शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली आहे. युरिया खत दोन दिवसांत उपलब्ध होईल असे सांगण्यात येत आहे.
जिल्ह्य़ात भातशेतीच्या कामासोबतच फळबागायतींनाही या हंगामात खतांची गरज भासते. शेतकरी वर्गाने यंदाच्या हंगामात प्रथमपासूनच कामांना सुरुवात केली आहे.
सुरुवातीला वळवाच्या पावसाच्या झटक्यातच तरवा पेरणी करणाऱ्यांनी लावणीला प्रारंभ केला, पण काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे तरवापेरणी उशिरा झाली व होत आहे. जिल्ह्य़ातील आठही तालुक्यांत भातशेती पीक घेताना वेगवेगळी पद्धत अवलंबली जाते.
जिल्ह्य़ात पाणथळ व भरडी शेती आहे, त्याला खतांची गरज लागते. जिल्ह्य़ातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यांत सम्राट खताची मागणी अधिक असते, तर युरिया खताला जिल्हाभर मागणी असते.
यंदा खतपुरवठा वेळेवर झाला असला तरी सम्राट खताने घोळ केला आहे. मागणीप्रमाणे पुरवठा झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत कृषी संस्था हे खत उपलब्ध करून देऊ शकल्या नाहीत. दोन दिवसांत युरिया खत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सम्राट खत उपलब्धतेसाठी खरेदी-विक्री संघ प्रयत्नशील आहेत.

Loksatta vasturang Skyscrapers are preferred in Pune news
पुण्यात गगनचुंबी इमारतींना प्राधान्य
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
womens in tribal and remote areas,
आईपण नको रे देवा?
Riverside beautification project development works Modern knowledge and technology
नद्यांवर जुनाट कल्पनांचे तटबंध!
Cloudy weather in Dadar rain during Dussehra melava in shivaji park
दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट, दादरमध्ये पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात
tigers existence in sahyadri belt
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात आठ वाघांचे अस्तित्व
village is changing but the question is the direction of the change
गाव बदलत आहे… प्रश्न आहे बदलाच्या दिशेचा
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…