गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यावर अर्बन नक्षल असल्याचा गंभीर आरोप केला होता. यावर आता स्वतः मेधा पाटकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “भूपेश पटेल यांचे आरोप अत्यंत हास्यास्पद आहेत. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मतं मिळू नयेत यासाठी हे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. त्यासाठीच नर्मदा बचाव आंदोलनाची बदनामी सुरू आहे,” असं मत मेधा पाटकर यांनी व्यक्त केलं. आरोप करणाऱ्यांना अर्बन नक्षल काय आहेत हेही माहिती नाही असं म्हणत त्यांनी पटेल यांना टोला लगावला. त्या गुरुवारी (१५ सप्टेंबर) धुळे जिल्ह्यातील शहादा येथे नर्मदा बचाव आंदोलनाच्या संवाद यात्रेत बोलत होत्या. यावेळी देशभरातून अनेक सजग नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी या संवाद यात्रेत सहभागी झाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा