सोलापूर : कृष्णा खोऱ्यात एकीकडे महापुराचे संकट ओढवले असताना दुसरीकडे दुष्काळी माण प्रदेशातील सांगोला व मंगळवेढ्यासह जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, माण, खटाव भागातील जनता दुष्काळाचे अरिष्ठ ओढू नये म्हणून प्रार्थना करीत आहे. त्याचा विचार करून महापुराचे वाया जाणारे पाणी दुष्काळी माण प्रदेशात वळवावे, अशी मागणी सांगोल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे २००३-०४ साली उपमुख्यमंत्री असताना कृष्णा खोऱ्यातील दरवर्षी येणाऱ्या महापुराचे पाणी भीमा खोऱ्यात वळवून सोलापूर, सांगली, सातारा, पुणे तसेच शेजारच्या मराठवाड्यातील धाराशिव, बीड आदी सहा जिल्ह्यांतील ३६ तालुक्यांना देण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण ही महत्त्वाकांक्षी योजना मंजूर करून घेतली होती. नंतर राजकीय शह-काटशहाच्या राजकारणात ही योजना बासनात गुंडाळून ठेवण्यात आली होती. तथापि, अलीकडे जागतिक बँकेने या योजनेसाठी अर्थसाह्य मंजूर केले आहे.

low pressure belt, Bay of Bengal,
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, हवामान खात्याचा इशारा काय?
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Panzara river, Dhule, bridges under water Dhule,
धुळे : पांझरा नदीच्या पुरामुळे धुळ्यात दोन पूल पाण्याखाली – नागरिकांना सतर्कतेचा इशारा
shiye kolhapur news, Shiye village bandh,
कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीला फाशी द्यावी; शिये गाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
Heavy rains in Satara Karad cities
सातारा, कराड शहराला पावसाने पुन्हा झोडपले; पाथरपुंजला साडेबारा इंच असा ढगफुटीसदृश पाऊस
Laborer murdered, Solapur, Laborer,
सोलापूर : दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मजुराचा खून
man gold chain snatched after threatening in mahapalika bhavan area
महापालिका भवन परिसरात तरुणाला धमकावून सोनसाखळी चोरी
tungbhadra dam gate broke
देशातील ‘या’ प्रमुख धरणाचा दरवाजा तुटला, पाण्याच्या मोठ्या विसर्गाने सतर्कतेचा इशारा; नक्की काय घडले? शेतकरी का घाबरले?

हेही वाचा – Prakash Ambedkar : “उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका दुर्दैवी”; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “भांडणं मिटवण्याऐवजी…”

हेही वाचा – पूरग्रस्तांनो घरी परतू नका… सांगलीत पाणीपातळीत घट तरीही वाढीव विसर्गाने भीती

या पार्श्वभूमीवर यंदा कृष्णा खोऱ्यात कोल्हापूर व सांगलीत आलेल्या महापुराच्या संकटाचा विचार करता हे महापुरात वाहून जाणारे १०५ टीएमसी पाणी भीमा खोऱ्यात वळविण्याची मागणी प्रकर्षाने होत आहे. आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी हाच धागा पकडून शासनाकडे मागणी केली आहे.