सोलापूर : जूनमध्ये मृग नक्षत्राच्या दमदार पावसामुळे उजनी धरणात पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली खरी; परंतु गेल्या दीड महिन्यात पावसाळा सुरू होऊनसुद्धा धरण अद्याप वजा पातळीतच राहिले आहे. वजा पातळीतून बाहेर येण्यासाठी आणखी १० टीएमसी पाणीसाठ्याची गरज आहे. तर धरण शंभर टक्के भरण्यासाठी तब्बल ७० टीएमसी पाणीसाठ्यापर्यंत मजल गाठावी लागणार आहे. सुदैवाने गेल्या तीन-चार दिवसांपासून उजनीच्या वरच्या भागात, सह्याद्री घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात थंडावलेल्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे उजनी धरणात पाण्याची आवक झपाट्याने वाढत आहे. बुधवारी दुपारी दौंड येथून उजनीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग २१ हजारांपेक्षा जास्त होता. उद्या गुरुवारी पाण्याची आवक ४० हजार क्युसेकपर्यंत वाढण्याचा अंदाज जलसंपदा विभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा