दिगंबर शिंदे, प्रदीप नणंदकर

सांगली, लातूर : अपुऱ्या पावसामुळे रब्बीचा घटलेला पेरा आणि थंडीच्या अभावामुळे उत्पादनातील संभाव्य घट यामुळे बाजारात शाळू ज्वारीची टंचाई निर्माण झाली असून दरही शतकाकडे वेगाने झेपावत आहेत. सध्या किरकोळ बाजारात प्रतिकिलो ज्वारीला ८५ रुपये मोजावे लागत आहेत.

Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Sakkardara lake, Nagpur, unsafe,
नागपूरच्या प्रसिद्ध सक्करदरा तलाव परिसर सर्वसामान्यांसाठी असुरक्षित, काय आहेत कारणे?
dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा
Tandoba Andhari Tiger, tigress did hunting,
VIDEO : अवघ्या काही महिन्याच्या वाघिणीने केली शिकार, पण..
yavatmal water pipe line scam marathi news
यवतमाळ जिल्ह्यातील जलवाहिनी घोटाळाः उच्च न्यायालयाकडून चौकशीचे संकेत…
Administrative approval for road works affected by heavy rain Funding in Vikramgarh Assembly Constituency Palghar
पालघर: पाऊस सर्वत्र मात्र अतिवृष्टी विक्रमगड विधानसभा क्षेत्रातच !
Woman Naxal Commander, Woman Naxal murder,
नक्षलवाद्यांकडून महिला नक्षल कमांडरची हत्या; पोलिसांशी संबंध असल्याच्या संशयातून…

गेल्या वर्षी रब्बी हंगामात घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ज्वारीचा भाव तीन ते साडेतीन हजार रुपये होता, तो आता साडेसहा हजारांपासून साडेसात हजारांवर गेला आहे. स्वच्छ केलेली ज्वारी आठ हजार रुपये क्विंटल दराने विकली जात आहे. सांगलीत एक नंबरच्या शाळूचा किरकोळ बाजारातील दर सोमवारी ८५ रुपये प्रतिकिलो होता. यामुळे गरिबाच्या ताटातील भाकरी यंदा ‘करपण्या’ची चिन्हे आहेत.

यावर्षी सुरुवातीला मोसमी पावसाने ओढ दिली. रब्बी हंगामात शाळू ज्वारी हे मुख्य पीक जिरायत जमिनीमध्ये घेतले जाते. पेरणीच्या हंगामात अपुरा पाऊस झाला. तरी चांगला पाऊस पडेल या आशेवर काही जणांनी पेरणी केली. मात्र दिवाळीत अवकाळी पाऊस पडेपर्यंत पावसाने ओढ दिली. यामुळे कोवळे पीक करपून गेले. परतीच्या पावसाची वाट पाहत पेरणीही काही ठिकाणी झाली नाही. सांगली जिल्ह्यात रब्बी ज्वारीची २० टक्के क्षेत्रावर पेरणीच झाली नसल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी सांगितले.

हेही वाचा >>> अधिवेशनात धानाला बोनस; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन; भंडाऱ्यात ‘शासन आपल्या दारी’

शाळू पिकाला सुरुवातीच्या काळात पाऊस अथवा रानात ओल आवश्यक असते. यानंतर केवळ थंडीच्या हवेवर शाळूचे पीक तयार होते. यंदा दिवाळी संपली तरी अद्याप थंडीचा शिरकाव झालेला नाही. यामुळे शाळूचे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. याचा परिणाम म्हणून बाजारातील आवकही कमी झाली आहे.

लातूर बाजारपेठेत सोमवारी ज्वारीची आवक केवळ ५० कट्टे इतकीच असून, सात हजार एकशे रुपये प्रतिक्विंटल दराने ज्वारी विकली गेल्याची माहिती अडत व्यापारी राजगोपाल बियाणी यांनी दिली. महाराष्ट्रात सोलापूर, नगर, लातूर, सांगली जिल्ह्यातील भागात रब्बी हंगामातील ज्वारीचा पेरा होतो. गोकुळाष्टमीच्या आसपास ऑक्टोबरमध्ये रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरण्या केल्या जातात. या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाऊस होता. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या लांबल्या. याशिवाय सोयाबीनचा पेरा उशिरा झाल्यामुळे त्याची काढणी लांबली. त्यामुळेही रब्बी हंगामातील पेऱ्याला फटका बसला आहे.

दर चढेच राहतील

सांगली बाजार समितीमध्ये सोमवारी शाळूची आवक केवळ १५० क्विंटल होती. किमान दर ४ हजार ५०० ते कमाल दर ६ हजार ६०० रुपये असल्याचे बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी सांगितले. तर बाजारात एक नंबरच्या शाळूचे दर क्विंटलला ८ हजारापर्यंत पोहचले असल्याचे धान्य व्यापारी विवेक शेटे यांनी सांगितले. चांगल्या प्रतीच्या शाळूचा किरकोळ बाजारातील दर प्रतिकिलो ८५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर हलक्या आणि स्थानिक शाळूचा किमान दर ६० रुपये किलोवर पोहोचला आहे. सुवर्णकार, नंद्याळ या ज्वारीचा दर तुलनेत कमी म्हणजे ४५ रुपये किलोपर्यंत आहेत असे पार्वती प्रोव्हिजनचे संचालक महेश फुटाणे यांनी सांगितले. लागवड आणि उत्पादनातील अशी दुहेरी घट यामुळे शाळूचे दर यंदा चढेच राहतील असा अंदाज आहे.

कमी पावसाचा फटका

पशुधनात घट झाल्यामुळे ज्वारीच्या पेऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल नाही. त्याऐवजी हरभरा पेरणीवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. यंदा पावसाने लवकर माघार घेतल्याने रब्बीच्या पेरणीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे तेच शेतकरी रब्बी हंगाम घेत आहेत.