सातारा: पुणे-बंगळूर महामार्गावर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी बसना राज्य शासनाने पथकरात सवलत दिलेली आहे. मध्यरात्री कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या सुमारे पन्नास एसटी बस साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर पथकरासाठी रोखण्यात आल्या. वाहक-चालकांनी पथकर देणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यावरून वादावादी होऊन तणाव निर्माण झाला. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. दरम्यान, भुईंज पोलीस निरीक्षक रमेश गर्जे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टोल नाका प्रशासनाशी चर्चा करून बस मार्गस्थ केल्या. त्यामुळे अखेर तणाव निवळला. आनेवाडी टोलनाक्यावरील सर्व मार्गिकेवर एसटी बस अडवण्यात आल्याने मध्यरात्रीच्या सुमारास तणाव निर्माण झाला. शेकडो वाहने मध्यरात्री पुणे-सातारा मार्गिकेवर अडकून पडली. त्यामुळे मोठा गोंधळ झाला.

हेही वाचा >>> साताऱ्यात ‘मोरया’चा जयघोष, वाद्यांचा गजर; गणरायांचे उत्साहात स्वागत

onion trader attacked robbed of rs 50 lakh cash in ahmednagar city
अडते व्यापाऱ्यांवर हल्ला करत ५० लाखांची लूट; दोघे जखमी,नेप्ती कांदा मार्केटजवळील घटना
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Sanjay raut criticise over Amit shah Lalbaugcha raja darshan
Sanjay Raut : “मुंबईतील उद्योग पळवले, आता लालबागचा राजा…”, अमित शाहांच्या दौऱ्याबाबत संजय राऊतांचा आरोप
education for underprivileged children from umed organization
सर्वकार्येषु सर्वदा : वंचित मुलांच्या उज्ज्वल भविष्याची ‘उमेद ’
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
ajit pawar baramati speech
Ajit Pawar on Baramati Elections: “मीही आता ६५ वर्षांचा झालोय”, अजित पवारांचं बारामतीमध्ये सूचक विधान; म्हणाले, “पिकतं तिथे विकत नसतं”!

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या खासगी मोटारी, एसटी बस तसेच इतर वाहनांसाठी महामार्गावरील सर्वच पथकरामधून राज्य शासनाकडून सूट देण्यात आली आहे. कोकणातील मार्गावर झालेली वाहनांची कोंडी, गर्दी आणि खराब रस्त्यांमुळे बहुसंख्य प्रवाशांनी पुणे कोल्हापूर मार्गे कोकणात जाणे पसंत केले आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पुणे बंगळुरू महामार्गावर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची मोठी गर्दी आहे. या वाहनांनाच काल मध्यरात्री साताऱ्याजवळील आनेवाडी टोल नाक्यावर पथकरासाठी अडवल्याने एकच गोंधळ उडाला. मुंबई, पुण्याच्या बाजूकडून आलेल्या एसटी बस कोल्हापूर, कराडवरून खाली कोकणच्या दिशेने जाणार होत्या. या बस आनेवाडी टोल नाक्यावर रात्री आल्या. कर्मचाऱ्यांनी चालकांकडे टोलची मागणी केली असता, वाहक व चालकांनी कोकणात जाणाऱ्या या बस असून, टोलमाफी असल्याचे सांगितले. मात्र, टोल प्रशासनाने शासनाकडून आम्हाला कोणताही आदेश आला नसल्याचे सांगून टोलशिवाय जाऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. दोन्ही बाजूंनी कडक भूमिका घेतल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. टोलनाक्यावरील सर्वच मार्गिकेवर या एसटी बस थांबल्या होत्या. त्यांच्या मागे अन्य वाहने अडकून पडल्याने महामार्गावर कोंडी झाली होती. एसटीतील प्रवाशांनी आक्रमक होऊन वाद घालायला सुरुवात केली. त्यामुळे तणावात भर पडली. एकच गोंधळ उडाला. अखेर हे प्रकरण भुईंज पोलीस ठाण्यापर्यंत गेले. त्यांनी टोल नाका प्रशासनाशी चर्चा करून बस मार्गस्थ केल्याने अखेर तणाव निवळला.