अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या भगव्या मोर्चानंतर संगमनेर शहराजवळी समनापूर गावात दोन गटात तुफान राडा झाला. भगवा मोर्चावरून परत येणाऱ्या काही तरुणांनी समनापूरमध्ये दगडफेक केल्याचा आरोप स्थानिकांनी केला. या दगडफेकीत पाच गाड्यांचे आणि दोन मोटरसायकलचे नुकसान झाले. तसेच काही लोक जखमीही झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संगमनेरमधील भगवा मोर्चावरून परतत असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डी. वाय. एस. पी. सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी जमावाला शांत केले. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

समनापुरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

या घटनेनंतर समनापुरात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी हे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

“समनापूरमध्ये समाजकंटकांनी १-२ गाड्यांच्या काचा फोडल्या”

या घटनेवर प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले, “संगमनेरमध्ये एक मोर्चा होता. तो मोर्चा दुपारी १२ वाजता संपला. त्यानंतर लोक आपआपल्या घरी परत जात असताना संगमनेरपासून ५-६ किलोमीटर अंतरावरील समनापूर गावात काही समाजकंटकांनी १-२ गाड्यांच्या काचा फोडल्या. त्यात काही लोक जखमी झाले.”

हेही वाचा : अहमदनगरमधील दंगलीवरून शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, “धर्माच्या नावाने…”

“दोषींवर कडक कारवाई केली जाईल”

“या प्रकरणातील दोषींचे फोटो आमच्याकडे आले आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. आता समनापूरमध्ये शांतता आहे. कुणीही अफवा पसरवू नये. या प्रकरणात आमचा तपास सुरू आहे,” असंही राकेश ओला यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stone pelting in samnapur sangamner ahmednagar after bhagava morcha rno news pbs
Show comments