सांगली : सजृनशीलतेची प्रतिके असलेली कातळशिल्पे वाळवा तालुक्यातील विविध भागात आढळत असून अशाच पध्दतीची कातळशिल्पे मानवी उत्क्रांतीमधील महत्वाचा टप्पा मानली जात आहेत.सचिन भगवान पाटील हे युवा संशोधक या काताळशिल्पाबरोबरच चक्रव्यूहांचा अभ्यास करत आहेत.पुण्यातील डेक्कन कॉलेज संशोधन संस्थेत पीएचडीचा अभ्यास करत असलेले पाटील कुरळप (ता. वाळवा) येथील आहेत. त्यांनी जिल्ह्यातील येडेनिपाणी येथील मल्लिकार्जुन डोंगर, इटकरे, वशी, शिवपुरी, ढगेवाडी, ऐतवडे बुद्रुक, डोंगरवाडी, नेर्ले, भाटवडे, कापरी या परिसरात काही महत्वपूर्ण अशी ठिकाणे शोधली आहेत. नजीकच्या काळात हे संशोधन अभ्यासासाठी उपलब्ध होणार आहे. या माध्यमातूनच प्राचीन काळापासून मानवाचा वावर वाळवे तालुक्यातील डोंगर रांगेत असलेबाबतचे संशोधनातून पुढे येत आहे. मल्लिकार्जुन डोंगर ते कापरी आणि डोंगरवाडी ते सुळकीचा डोंगर या पर्वतमालेत काळ्या कातळावर आढळणारी कोरीव चिन्हे म्हणजे मानवी उत्क्रांतीतील या पाऊलखुणा आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा