मणिपूरहून निघालेल्या राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा रविवारी (१७ मार्च) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील जाहीर सभेने समारोप झाला. या निमित्ताने विरोधकांच्या इडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. मणिपूरमधून निघालेली राहुल गांधी यांची यात्रा दोन महिन्यांनंतर सुमारे ६,७०० किलोमीटरचा प्रवास करून मुंबईत दाखल झाली. त्यानंतर मुबईच्या शिवाजी पार्कवर या यात्रेचा समारोप करण्यात आला. शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी जाहीर सभा घेतली. या सभेला जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यापासून ते शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांपर्यंत अनेक मोठे नेते उपस्थित होते.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील या सभेला संबोधित केलं. यावेळी भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा उल्लेख केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी, “जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त, देशप्रेमी बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो…” अशी हाक देत भाषणाला सुरुवात केली. परंतु, उद्धव ठाकरे एरवी “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो…” अशी हाक देत भाषणाला सुरुवात करतात. उद्धव ठाकरे यांच्या याच बदलेल्या कृतीवरून त्यांच्यावर भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून टीका होत आहे.

Anyone embezzling in Anand Dighe's ashram should be thoroughly investigated
आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
home minister amit shah slams rahul gandhi over reservation remark in america
राहुल यांच्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
Balasaheb Thorat, Gulabrao Patil, Finance Minister,
महायुतीने राज्य बरबाद करण्याचे काम केले, अर्थमंत्र्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो – बाळासाहेब थोरात
bajrang punia replied to brij bhushan singh
“विनेशच्या अपात्रतेचा आनंद साजरा करणारे…”; बृजभूषण शरण सिंह यांच्या ‘त्या’ टीकेला बजरंग पुनियांचे जोरदार प्रत्युत्तर!
Where are the modern Indian political thinkers says Yogendra Yadav
आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत आहेत कुठे?
parental challenges, children s independence, generational tensions, family dynamics, emotional support, parent child relationship,
सांधा बदलताना : कळा ज्या लागल्या जीवा
Sharmila Thackeray on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
Sharmila Thackeray : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शर्मिला ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, “कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे…”

राज्याचे सांस्कृतिक मंत्री आणि भाजपाचे लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील या कृतीवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुनगंटीवार म्हणाले, असंगाशी संग केल्यावर आणखी काय होणार? हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो…” अशी हाक देत भाषणाची सुरुवात करायचे. परंतु, उद्धव ठाकरे यांना त्याचा विसर पडलेला दिसतोय. काँग्रेससह इतरांशी संगत केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना त्यांची भाषा बदलावी लागली.

हे ही वाचा >> “माझ्या देशाचं नाव बदलण्याचा प्रयत्न”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “हुकूमशाह कितीही मोठा असला तरी…”

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, मला काँग्रेसबरोबर जावं लागेल तेव्हा मी माझं दुकान बंद करेन. बाळासाहेबांच्या या वक्तव्याचा अर्थ उद्धव ठाकरे समजू शकले नाहीत. त्यांचं दुकान आता बंद व्हायला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या या कृतीला आपल्या तत्वचिंतनात असंगाशी संग म्हटलं जातं.