सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या साखर अडविण्याच्या आंदोलनामुळे साखर चोरीचे नवे प्रकार समोर आले असून याबाबत जीएसटी व आयकर विभागाकडे तक्रार करणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी सांगितले. मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ४०० रुपये मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेची जनआक्रोश पदयात्रा पुन्हा शुक्रवारपासून सुरू झाली असून आज ही पदयात्रा कसबे डिग्रज येथे आली होती. यावेळी खासदार शेट्टी बोलत होते.

राजू शेट्टी म्हणाले की, मागील हंगामातील देणे मिळाल्याशिवाय कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत आणि कारखान्यातून साखर बाहेर काढू दिली जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. कारखान्यातून विक्रीसाठी बाहेर जात असलेली साखर अडवत असताना साखर चोरीचे काही प्रकार समोर आले असून याचे पुरावे मिळविण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. साखर चोरीचे पुरावे उपलब्ध होताच, याबाबत जीएसटी व आयकर विभागाकडे तक्रारी दाखल करण्यात येतील.

Sugar Commissionerate is committed to go above and beyond to ensure human rights of sugarcane workers
ऊसतोड कामगारांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध, साखर आयुक्त कुणाल खेमनर यांची ग्वाही
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Samajwadi Party opposed BMC budget property tax
व्यावसायिक झोपड्यावर मालमत्ता कर आकारण्यास समाजवादी पक्षाचा विरोध, घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्कालाही विरोध
girish kuber
जुनी करप्रणाली अप्रत्यक्ष मोडीतच;‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमात तज्ज्ञांचे मत
nyaymurti mahadev govind ranade lokrang article
प्रबोधनयुगाच्या प्रवर्तकाचे विचार
Nutrition Diet , Maharashtra School, Sweet Food ,
पोषण आहार बदल! साखर लोकांना मागा पण गोडधोड खाऊ घाला, अनुदान नाहीच
lokmanas
लोकमानस: लोकशाही की एकाधिकारशाही?
Increase in ST fares after elections are over is fraud with poor people Vijay Vadettiwar criticizes
निवडणूक होताच एसटीची दरवाढ, ही गरीब जनतेची लूट; विजय वडेट्टीवार यांची टीका

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर, दरे गावाला भेट

हेही वाचा – एल्विश यादव प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, विरोधकांना प्रत्युत्तर देत म्हणाले…

मागील हंगामातील ४०० रुपये मिळाले नाहीत म्हणून आमची दिवाळी जर शिमग्यासारखी झाली तर कारखानदारांनाही दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला. भडक व हिंसक आंदोलनाविना सरकारला जाग येत नाही, मात्र, आम्ही कारखानदाराचं नाक दाबत असल्याने कारखानदारच सरकारला सांगतील. यामुळे शासनाला हस्तक्षेप करावाच लागेल. आता कोल्हापुरातील कारखानदार तोंड उघडू लागले आहेत.
शेतकर्‍यांच्या आंदोलनाची ना सरकार दखल घेते, ना विरोधक. कारण या सर्वांचे साखर कारखाने असून त्यांना मिळून शेतकर्‍यांचे बाराशे कोटी रुपये वाटून खायचे आहेत, अशी टीका शेट्टी यांनी यावेळी केली.

Story img Loader