देशात २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. केंद्रातील मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधक ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. पण, ‘इंडिया’ आघाडीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला निमंत्रण देण्यात आलं नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं ४८ जागांवर लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं घोषित केलं आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते, सुजात आंबेडकर यांनीही काँग्रेससह इंडिया आघाडीला इशारा दिला आहे.

‘एबीपी माझा’शी बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले, “भाजपाचा पराभव करण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीनं वंचितला निमंत्रण देऊन समाविष्ट करायला हवं. पहिल्या निवडणुकीत ४२ लाख मते घेणारी वंचित आघाडी नक्कीच इंडिया आघाडीची ताकद वाढवू शकते. महाराष्ट्रात भाजपा आणि आरएसएसचा पराभव करण्यासाठी निर्णयक ठरू शकतो.”

Yogendra Yadav talk on Vanchits uproar says This is an attack on Babasahebs constitution
वंचितच्या गोंधळानंतर योगेंद्र यादव म्हणाले “हा तर बाबासाहेबांच्या संविधानावर हल्ला”
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
prakash ambedkar allegation on sharad pawar
“मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती”; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; म्हणाले, “दुबई विमानतळावर…”
article about prakash ambedkar vanchit bahujan aghadi poor performance
पुणेकरांच्या मतांपासूनही ‘वंचित’
Dhammachakra Pravartan Din, Deekshabhoomi Nagpur,
नागपुरात लोटला भीम सागर, निळ्या रंगाच्या सम्यक पताकांनी सजली दीक्षाभूमी
Babasaheb Ambedkar BDD complex, Naigaon BDD Chawl,
शरद पवार नगर नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल, नायगाव बीडीडी चाळीचे नाव बदलले
kiren rijiju controversial remarks on rahul gandhi
राहुल गांधींसारखे विरोधी पक्षनेते देशाला शाप! संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांची टीका
ncp sharad pawar peace walk in mumbai
मंत्रालयासमोर ‘राष्ट्रवादी’ची शांतता पदयात्रा

हेही वाचा : “…तर पळून जाऊन लग्न करा”, जयंत पाटलांचा प्रकाश आंबेडकरांना टोला

“पण, इंडिया आघाडी विचित्र का वागतेय? त्यांच्याकडून निर्णय येत नाही. वंचितांसाठी इंडिया आघाडीचे दरवाजे का बंद आहेत? हा प्रश्न आमच्या डोक्यात सुरू आहे,” असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलं.

हेही वाचा : “राज्यात भाजपाच बॉस”, फडणवीसांच्या विधानाचं समर्थन करत सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला, म्हणाल्या…

“इंडिया आघाडीकडून निमंत्रण आलं नाही, तरी निवडणूक लढणार. भाजपाचा पराभव करण्यासाठी आघाडी व्हावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. इंडिया आघाडीनं निमंत्रण दिलं नाही, तर कार्यकर्त्यांची इच्छा रागात बदलेल. त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो,” असा इशारा सुजात आंबेडकर यांनी दिला आहे.