नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांनी आता राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. राज्यसभेच्या १० जागांसाठी आता निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सुनेत्रा पवार यांनी काही वेळापूर्वी महाराष्ट्र विधान भवनात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. तसेच त्यांनी पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चेवरही भाष्य केलं. सुनेत्रा पवार म्हणाल्या, “पक्षाने मला राज्यसभेची अधिकृत उमेदवारी दिली आहे, त्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, इतर नेते आणि पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानते.” दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं की “उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १८ जूनपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे विजयासाठी वाट पाहावी लागेल. मी त्याबद्दल आत्ताच कोणतंही वक्तव्य करणार नाही.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा