२०१४ साली ७० हजार कोटी हा शब्दप्रयोग समोर आला. पण, १९५२ ते २०१२ या कालावधीत सिंचन प्रकल्पांवर ७० हजार कोटी रूपयांचा खर्च झाला. पण, अजित पवारांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं. कारण, अजित पवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद उभी राहिली होती, असं विधान खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे. ते कर्जतमधील अजित पवार गटाच्या शिबीरामध्ये बोलत होते.

सुनील तटकरे म्हणाले, “२०१४ मध्ये अजित पवार, छगन भुजबळ आणि माझ्यावर आरोप करण्यात आले. ७० हजार कोटी हा शब्दप्रयोग तेव्हाच समोर आला. मात्र, १९५२ ते २०१२ या कालावधीत सिंचनावर ७० हजार कोटी रूपये खर्च झाले होते. जायकवाडी, उजनी, गोसीखूर्द आणि अन्य महाराष्ट्रातील धरणांना ७० हजार कोटी खर्च झाले. त्यातील १५ हजार कोटी आस्थापनं, १७ हजार कोटी भू-संपादन आणि प्रकल्पावर जवळपास ३० ते ३५ हजार कोटी रूपये खर्च झाले.”

Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Pankaja Munde on Dhananjay Munde
“धनंजय मुंडे फडणवीस-पवारांचे खास, राजीनामा मागणार नाहीत”, क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर; म्हणाल्या…
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”

“अजित पवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद उभी राहिली”

“लाखो हेक्टर जमीन ओलीताखाली आली. महाराष्ट्रातील कृषीमालाचं उत्पादन वाढलं. पण, अजित पवारांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं. कारण, अजित पवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद उभी राहिली होती” असं तटकरेंनी सांगितलं.

“भाजपाने पाठिंबा मागितला नसतानाही राष्ट्रवादीनं जाहीर केला”

“२०१४ साली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच मला आणि प्रफुल्ल पटेल यांना भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याबाबत घोषित करण्यासाठी सांगितलं. भाजपाने पाठिंबा मागितला नसतानाही राष्ट्रवादीनं जाहीर केला. महाराष्ट्रात तेव्हा सरकार स्थापन झालं. त्यानंतर ‘मी अलिबागला बैठक’ बोलावल्याचा दावा कुणीतरी केला. पण, ती बैठक मी नव्हती, तर शरद पवारांच्या सांगण्यानुसार पराभूत आणि विजयी उमेदवारांचं शिबीर बोलावण्यात आलं होतं,” असं तटकरेंनी म्हटलं.

Story img Loader