अलिबाग : अनिश्चित काळासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका रोखणे, हे लोकशाहीसाठी घातक आहे. प्रशासनाची ताब्यात यंत्रणांच्या अनिश्चित काळासाठी सत्ता देणे योग्य नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. राज्यसरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घ्याव्यात अशी भूमिका त्यांनी मांडली.

ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्हा परिषद, नगर पालिका आणि महानगर पालिकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर लगेचच निवडणूका घेणे गरजेचे आहे. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत केवळ सहा महिन्यांकरता स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासनाच्या ताब्यात दिला जाऊ शकतो. मात्र गेल्या वर्षभरापासून या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज कार्यरत आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. आता या निवडणूका कधी होतील हे राज्यसरकार आणि देवालाच माहीती. पण अनिश्चिच काळासाठी निवडणूका रोखणे योग्य नाही. ते घटना दुरुस्तीला धरूनही नाही. त्यामुळे राज्यसरकारने लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

lavasa loksatta news,
लवासा प्रकरण : सीबीआय चौकशीची मागणी कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maharashtra Growth Momentum Fadnavis Updates at NITI Aayog
राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आराखडा महत्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
UCC in Gujarat : कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार?
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
Hearing on municipal elections in Supreme Court on February 25
निवडणुका पावसाळ्यानंतर? पालिकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आता २५ फेब्रुवारीला सुनावणी
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका

कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. शेकापचे बाळाराम पाटील हे आमचे उमेदवार आहेत. गेल्या सहा वर्षात त्यांनी चांगले काम केले आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावण्याच महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे या निवडणूकीतही त्यांना यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.आरसीएफ सारखा प्रकल्प जनसुनावणी लवकर होणे गरजेचे आहे. अन्यथा हा प्रकल्पही गुजरात मध्ये जाऊ शकतो. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटले पाहीजेत, पण त्यासाठी प्रकल्प व्हायला हवा. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि केंद्रीय रसायन मंत्री यांना पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. गेल्या चार वर्षात पंतप्रधान ग्राम सडक योजने ३ आंतर्गत राज्यात एकही एकही काम मंजूर करण्यात आले नव्हते. या संदर्भात केंद्रीय मंत्रीमंडळाकडे पाठपुरावा केल्यानंतर ४८ कोटी रुपयांची ११ कामे रायगड जिल्ह्यात मंजूर करण्यात आली असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

Story img Loader