राष्ट्रवादी काँग्रेसला प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे यश मिळालं आहे. माझ्यामुळे पक्षाला अपयश येत असेल, तर मी स्वीकारते. यालाच नेतृत्व म्हणतात. प्रफुल्ल पटेल यांची पक्षात कशामुळे घुसमट होत होती, माहिती नाही, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांना २५ वर्षांपासून नेते मानलं आहे. त्यामुळे पटेल यांची पक्षात कशामुळे घुसमट होत होती, माहिती नाही. पटेल यांची खदखद आमच्या कानापर्यंत कधी आली नाही. प्रफुल्ल पटेल आठवड्यातून तीन वेळा शरद पवार यांना भेटायचे. सहा जनपथ हे जेवढं माझं तेवढंच प्रफुल्ल पटेल यांचंही घर होतं.”

Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Walmik Karad, Dhananjay Munde
“फरार असताना वाल्मिक कराडने संपत्तीचं…”, ठाकरे गटाला वेगळाच संशय; धनंजय मुंडेंचा उल्लेख करत म्हणाले…
Nitin Gadkari
Nitin Gadkari: “… तर मीच बुलडोझर घेऊन येतो”; नितीन गडकरींचा सज्जड दम, कारण काय?
ajit pawar
उलटा चष्मा : भ्रष्ट असलो, तर काय बिघडले?
MLA Rohit Pawar On NCP Sharad Pawar
Rohit Pawar : शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्या पक्षात फेरबदल…”

हेही वाचा : “आदित्य ठाकरेंनी आमच्या सरकारला ‘सळो की पळो’ केलं नाहीतर…”, भाजपा खासदाराचा टोला

“दिल्लीमधील अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात कार्य करत आहे. यामुळे मराठी माणसाचे खूप मोठं नुकसान हा अदृश्य हात करीत आहे,” असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

हेही वाचा : किरण सामंत यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर ठाकरेंच्या ‘मशाल’ चिन्हाचा डीपी; उदय सामंत म्हणाले…

“पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी परिवारवादाचा विरोध करतात. पण, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी स्वबळावर स्थापन केलेल्या दोन पक्षांना तोडण्याचे काम भाजपानं केलं आहे. ठाकरे आणि पवार यांनी शून्यातून पक्षनिर्मिती केली. दोन्ही पक्षांना तोडून भाजपानं महाराष्ट्राचं नुकसान केलं आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

Story img Loader