शिर्डी येथे चालू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या शिबिरात खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मार्गदर्शन केलं. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात आगामी निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार येईल. आपलं सरकार आल्यावर सर्वप्रथम आपण अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवू. त्यापाठोपाठ शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. आपल्याकडे (शरद पवार गट) गृहखातं आल्यास राज्यात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करू. दिवंगत मंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्याचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या. आबांच्या (आर. आर. पाटील) काळात राज्यात जशी कायदा आणि सुव्यवस्था होती तशीच पुन्हा निर्माण करू.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझं भाषण रेकॉर्ड करून ठेवा. आपण सत्तेत आल्यावर आपण लोकांसाठी सर्वप्रथम काय करणार? आपला म्हणजेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाल्यावर त्या मुख्यमंत्र्याची पहिली सही ही अंगणवाडी सेविकांसाठी असेल. तसेच धनादेशावरील पहिली सही ही शेतकऱ्यांसाठी असेल. या महाराष्ट्रातील कष्टकऱ्याची म्हणजेच इथल्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्यासाठी आपला मुख्यमंत्री धनादेशावर पहिली सही करेल. हा माझा शब्द आहे. मी पुन्हा सांगते, माझं भाषण रेकॉर्ड करून ठेवा.

Devendra Fadnavis Exclusive
Devendra Fadnavis : “कामाच्या नुसत्या घोषणा नाही, १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देणार”, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली योजना
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

मानधन वाढ आणि पेन्शनसाठी अंगणवाडी सेविकांची आंदोलनं चालू आहेत. तसेच शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर सर्वात आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली जाईल, असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.

शिर्डीत पक्षाच्या शिबिरात केलेल्या भाषणात सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपलं सरकार महिला सुरक्षेलादेखील प्राधान्य देईल. आपण महिलांना सुरक्षा कशी देणार? एकदा आपल्या सरकारचा याआधीचा कारभार आठवून पाहा. आर. आर. आबा आणि अनिल देशमुख यांच्याकडे गृहमंत्रीपद होतं. तेव्हा जशी व्यवस्था होती, तशी पुन्हा निर्माण केली जाईल. राज्यातल्या प्रत्येक आईला तिचा मुलगा, मुलगी घराबाहेर पडले की, ते परत येतील की नाही याची काळजी वाटते. मी तुम्हाला शब्द देते, राज्यातल्या लेकींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केलं जाईल. हा सुप्रिया सुळेचा शब्द आहे.

हे ही वाचा >> ‘रामायणात सीतामाईचं, तर कलियुगात पक्ष-चिन्हाचं अपहरण’, जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर अमोल कोल्हेंचं श्रीरामावर भाष्य

‘मोदी की गॅरंटी’वर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील नेत्या सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या ‘मोदी की गॅरंटी’ (पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी) या घोषणेवर टीका केली. त्या म्हणाल्या, मी राज्यातल्या जनतेला शब्द देते की, राज्यात महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार केलं जाईल. हा माझा शब्द आहे. ही काही गॅरंटी नाही, कारण गॅरंटी मर्यादित काळासाठी असते. शब्दाला आयुष्यभर किंमत असते. गॅरटी एक वर्ष, तीन वर्षे किंवा पाच वर्षांसाठी असते, परंतु, शब्द कायम असतात. त्यामुळे ही स्वाभिमानी मराठी मुलगी तुम्हाला शब्द देत आहे की, महिला सुरक्षितता हा तुमच्या माझ्या सरकारचा सर्वात मोठा कार्यक्रम असेल.

Story img Loader