शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सुषमा अंधारेंनी हिंदू देवी-देवतांना आणि साधु संतांबद्दल करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावरून महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ आक्रमक झाला आहे. वारकरी महामंडळाकडून सुषमा अंधारेंविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात सुषमा अंधारेंनी हिंदू देवी-देवता आणि साधु-संताबाबत आक्षेपार्ह विधानं केली आहे. त्यामुळे वारकरी महामंडळ अंधांरेविरुद्ध आक्रमक झाला आहे. तर, आळंदीत त्यांच्या विधानाचा निषेध म्हणून प्रेतयात्रा काढण्यात आली. याप्रकरणावर आता सुषमा अंधारेंनी भाष्य केलं आहे.

BJP MP Ashok Chavan
Ashok Chavan : “राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला”, अशोक चव्हाणांचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेस…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
K T Rama Rao On Delhi Election Result
Delhi Election Result : ‘विजय भाजपाचा, पण अभिनंदन राहुल गांधींचं…’; BRS च्या कार्याध्यक्षांची दिल्लीच्या निकालावर खोचक प्रतिक्रिया!
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
Namdev Shastri Maharaj kirtan on Bhandara mountain postponed
पिंपरी : नामदेव महाराज शास्त्री यांचे भंडारा डोंगरावरील कीर्तन रद्द
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
Anjali Damania on Shashtri
Anjali Damania : “अतिशय आदरपूर्वक मला…” महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर अंजली दमानियांची प्रतिक्रिया!

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “भागवत संप्रदायातील संतपरंपरेला वाटत असेल, मी चुकत आहे. पण, मी एकाही पक्षाची, राजकीय नेत्याची माफी मागितली नाही, कारण ती माझी स्टाईल आहे. तरीसुद्धा कळत नकळत माझ्या बोलण्याने वारकरी संत सांप्रदायातील भावना दुखावल्या असतील, तर क्षमा मागण्यासाठी काही गैर वाटणार नाही.”

हेही वाचा :  “रस्ता उत्तम आहेच, पण एवढा टोल…”, जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका!

“२०१७-१८ साल किंवा शिवसेनेत प्रवेश केल्यापासून मी याविषयांबद्दल जास्त विधान करत नाही. आधी जरी त्या विषयांवर भाष्य केलं, तरी त्याच्यामागील लॉजिक समजून घेतलं पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा एक आणि नंतर एक भूमिका मांडली. त्यांना याबद्दल विचारण्यात आलं, यातील कोणती भूमिका महत्वाची मानायची. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले, मी नंतर जे बोललो ते जास्त महत्वाचं आहे,” असा संदर्भ सुषमा अंधारेंनी दिला आहे.

हेही वाचा : “आता यांनी कहर केलाय” म्हणत अजित पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…!

“वारकऱ्यांकडून माझी प्रेतयात्रा काढण्यात आली. इतिहास साक्षी आहे, या देशात अनेक समाज सुधारकांच्या प्रेतयात्रा काढण्यात आल्या. राजकीय सुडबुद्धीने हे करण्यात आल्याने याचा थोडा खेद वाटतो. मात्र, वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये. अशी प्रेतयात्रा वारकरी संप्रदायातील बसत नाही. किंबहुना प्रेतयात्रेजवळ कोणी भगवा फेटा घालून बसत नाही. माझ्या प्रेतयात्रेत एक महाराज भगवा फेटा घालून होते. या भगव्या रंगाचा तुम्ही अवमान करत आहात,” असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

Story img Loader