राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. माझ्या विभागाच्या अखत्यारीत राज्यातील चार वेड्यांची रुग्णालये येतात. तिथे कुठे जागा असेल तर आदित्य ठाकरे यांना दाखल करुन त्यांच्यावर उपचार करु, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यावर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सातारा येथे बोलत असताना तानाजी सावंत यांना प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, “काही लोक आरशात बघून बोलत असतात. कदाचित आमचे बंधू तानाजी सावंत आरशात बघून बोलत असतील.” सातारा येथे पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांच्या आरोपाचा समाचार घेतला.

हे वाचा >> आदित्य ठाकरेंविषयी प्रश्न विचारताच तानाजी सावंत आक्रमक; म्हणाले “मेंटल हॉस्पिटल…”

PM Narendra Modi Speech
JKF’S Forgotten Crisis हे पुस्तक विरोधकांनी वाचावं, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का दिला? नेहरुंबाबत काय दावे आहेत?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
AnJali Damania on Dhananjay Munde
Anjali Damania : “दमानिया नव्हे बदनामिया”, धनंजय मुंडेंच्या टीकेवर अंजली दमानियांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “खरंतर मला…”
bryan johnson
Bryan Johnson : भारतातील खराब हवेमुळे अमेरिकेच्या इन्फ्लुएन्सरने शुटींग मध्येच थांबवलं; मास्क अन् एअर प्युरिफायर असतानाही आरोग्यावर परिणाम!
MLA Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय”, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले, “बीडमध्ये अजून…”
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Guillain Barre syndrome treatment
‘जीबीएस’च्या उपचारांवरून आमदारांची नाराजी, अवास्तव दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इशारा
loksatta editorial on Stampede at Mahakumbh in Prayagraj
अग्रलेख: मेजॉरिटीची मौनी ममता!

आरशात बघून स्वगत बोलणाऱ्या लोकांवर आपण फार व्यक्त न झालेलं बरं. कवी केशवसूत यांच्या कवितेची एक ओळ सांगून सुषमा अंधारे म्हणाल्या की, पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा. त्यामुळे त्यांचे जेवढे डोकं आहे, तेवढं त्यांनी चालवलं आहे. त्यांच्या स्तरावर आम्ही उतरणार नाही. आम्हाला एका अत्यंत सुसंस्कृत, संयमी आणि सभ्य नेतृत्वाचे आदेश आहेत. आम्ही आमची पातळी कधीही सोडणार नाही, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी तानाजी सावंत यांच्यावर टीका केली.

पंतप्रधान मोदी, अमित शाह यांनी मुंबईतच २ बीएचकेचा फ्लॅट घ्यावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका महिन्यात दुसऱ्यांदा मुंबईचा दौरा केला होता. या दौऱ्यावर टीका करत असताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, त्यांनी असे सतत दौरे करु नयेत. अमित शहा किंवा मोदीजी असतील. त्यांनी असे सतत दौरे करुन उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नावाने कंठशोष करण्यापेक्षा ती एनर्जी वाचवून ठेवावी. मुंबईतच एखादा टू बीएचकेचा फ्लॅट घ्यावा आणि इथेच मुक्काम करावा. कारण त्यांनी शिवसेनेची धास्ती घेतली आहे, ही धास्ती त्यांच्या सततच्या दौऱ्याचे द्योतक आहे. येणाऱ्या काळात त्यांना आव्हान फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे देऊ शकतात, हे निश्चित.

हे वाचा >> आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मोदींची केली थेट महादेवाशी तुलना; म्हणाले “जगातील…”

संजय शिरसाट यांचे लांगुलचालन

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला हव्या होत्या, असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केले होते. त्यावर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, संजय शिरसाट यांना १४ तारखेनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे लांगुलचालन करणे त्यांना गरजेचे वाटते. पण मला आमचे नेतृत्व आवडते, याचे कारण ते फार सच्चेपणाने वागतात. तोंडावर एक, मागे एक बोलण्यापेक्षा रोखठोक बोलायला त्यांना आवडते

. शिवसेना एक ओपन किचन आहे, जे पोटात, ते ओठात. त्यामुळे उगाच संजय शिरसाट यांनी आपले रक्त आटवून घेऊ नये, असा सल्ला सुषमा अंधारे यांनी दिला.

Story img Loader