महाराष्ट्र ड्रग्जमुक्त आणि नशामुक्त झाला पाहिजे. आज विजयादशमीचा दिवस आहे. त्यादिवशी एक संकल्प करु. महाराष्ट्राचा उडता पंजाब व्हायला नको म्हणून आम्ही सातत्याने एक भूमिका घेऊन उभे आहोत. १० ऑक्टोबरला ३०० कोटींचा ड्रग्जचा साठा सापडला. मुंबईत ७१ कोटींचं कोकेन जप्त झालं. संभाजी नगरमध्ये २३ कोटींचं ड्रग्ज सापडलं. मुळा नदीच्या पात्रात ड्रग्ज सोडण्याचा प्रयत्न झाला. ज्या ज्या लेकीला, पत्नीला, आईला वाटतं की आपल्या घरात व्यसन नको ती प्रत्येक स्त्री माझ्याशी सहमत असेल असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यात आक्रमक भाषण केलं. त्यावेळी त्यांनी ड्रग्ज प्रकरणावरुन महाराष्ट्र सरकारवर टीका केली.

दहा दिवसांपासून माझ्याशी मांडवलीची भाषा

आम्ही प्रश्न विचारले की मंत्री घाबरवतात. धमक्या देतात, अब्रू नुकसानीचा दावा करु सांगतात. मागच्या दहा दिवसांपासून माझ्याशी मांडवलीची भाषा करतात. माध्यमांच्या समोर एक बोलायचं पाठीमागून दुसरीच कृत्यं करायची हे काय चाललंय? व्हाया सुरत गुवाहाटी अब्रू कुठे ठेवली होती? असा प्रश्न सुषमा अंधारेंनी विचारला आहे.

PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra kesari Kaka Pawar on Shivraj Rakshe About Controversy
Maharashtra Kesari: “महाराष्ट्र केसरीच्या पंचांना जन्मठेप देणार का?” शिवराज राक्षेच्या निलंबनानंतर कुस्ती प्रशिक्षकांचा संतप्त सवाल, नेमकं काय म्हणाले?
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Transformational Shastri and Original Eccentricity LaxmanShastri Joshi
तर्कतीर्थ विचार: परिवर्तनवादी शास्त्री आणि मौलिक विलक्षणता
ड्रग्जच्या विळख्यात सापडलेल्या पंजाबने केंद्राकडे ६०० कोटींची मदत का मागितली? (फोटो सौजन्य द इंडियन एक्स्प्रेस)
Punjab Drug Case : ड्रग्जच्या विळख्यात सापडलेल्या पंजाबने केंद्राकडे ६०० कोटींची मदत का मागितली?
Akola Amravati and Malegaon are main centers that issue certificates to Bangladeshis alleges Kirit Somaiya
“बांगलादेशींना प्रमाणपत्र देणारे अकोला, अमरावती आणि मालेगाव मुख्य केंद्र,” किरीट सोमय्या यांचा आरोप
Akola , Bangladeshi Rohingya, Birth Certificate,
दोन लाख बांगलादेशींना जन्म दाखल्याचे वाटप; भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

मला नाही अब्रू मी कशाला घाबरु अशी अनेकांची अवस्था

मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरु? अशी म्हण आहे. या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांची अवस्था अशीच असेल. गृहमंत्र्यांना विचारलं की म्हणतात मुखवटे बाहेर येतील. मी याँव करीन आणि त्याँव करीन. गृहमंत्र्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही आमच्या पक्षातल्या लोकांना खोट्या गुन्ह्यांखाली अडकवलंच ना? गृहमंत्री म्हणून ललित पाटीलला मागचे नऊ महिने का लपवलं होतं? त्यासाठी इतका वेळ का लागला? असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारले आहेत. ललित पाटील आमच्या पक्षाचा आहे हे सांगत आहात. मात्र आज तुम्हाला सांगते आहे बात निकलेगी तो दूर तलक जायेगी. इथे पक्षाचा प्रश्न नाही. महाराष्ट्रातला तरुण व्यसनाधीन व्हायला नको ही आमची भूमिका आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

देवेंद्र फडणवीसांना अनेकजण चाणक्य म्हणतात मला ते अजिबात पटत नाही

देवेंद्र फडणवीस यांना लोक चाणक्य म्हणतात. मला ते पटत नाही. कारण चाणक्याने माणसं घडवायची असतात. उदाहरणार्थ शरद पवार त्यांनी हसन मुश्रीफ, अजित पवार, छगन भुजबळ यांना घडवलं. देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला घडवलं? त्यांनी कुणालाच घडवलं नाही, त्यांनी फक्त जमवलं. तुमच्याकडे बोलायला लोकच नाहीत. विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे असे अनेक लोक तुम्ही संपवले आहेत असाही आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे. तुमचा पक्ष इतका मोठा आहे तर मग शिवसेनेतून आणि राष्ट्रवादीतून उचलेगिरी का करत आहेत? हा माझा त्यांना सवाल आहे असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

Story img Loader