मराठा आरक्षणाचा पेच अद्यापही सुटलेला नाही. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तसंच, त्यांनी महाराष्ट्रभर दौरे चालू केले आहेत. परंतु, मराठ्यांना आरक्षण देण्यावरून मराठा समाजातच अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. सातारा येथे गांधी मैदानावर जरांगे मनोज जरांगे यांची शनिवारी सभा झाली. या सभेला मराठा समाजातील काही आंदोलकांनी विरोध केला होता.

“आरक्षण हवे असेल तर मराठ्यांना कुणबी हा शब्द धारण केलाच पाहिजे. ज्यांना कुणबी म्हणवून घेण्याची लाज वाटते त्यांना आरक्षण तर मिळणार नाहीच पण त्यांनी शेतीदेखील करू नये, अशा शब्दांत मनोज जरांगे मराठा समाजातील विरोधकांवर टीका केली. पोवई नाक्यावरील शिवतीर्थावरील सभेचे ठरलेले स्थळदेखील या विरोधामुळे बदलण्यात आले होते.

controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
Sanjay Rathod , suicide case girl,
तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना दिलासा, फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका निकाली

मराठ्यांचे ‘सरसकट कुणबीकरण’ या जरांगेंच्या मागणीला कडाडून विरोध करत या मराठा आंदोलकांनी त्यांच्यावर टीका केली होती. तसेच जरांगे यांच्या आंदोलनामागे समाजाची मराठा ही असलेली ओळख पुसण्याचा डाव असल्याचा आरोपही केला होता. या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी स्वसमाजातील विरोधकांवर साताऱ्यात येऊन टीकास्त्र सोडले.

जरांगे म्हणाले, की लढाई करणारे मराठे तर शेती करणारे हे कुणबी असतात. मग सध्याचे लोक लढाई करत आहेत की शेती हे सांगावे. शेती व्यवसाय करूनही ज्यांना कुणबी म्हणवून घेण्याची लाज वाटते त्यांना आरक्षण तर मिळणार नाहीच पण मग त्यांनी शेती विकून चंद्रावर जावे. समाजातील मोठा वर्ग आता जगण्याची लढाई लढत आहे. त्याला या असल्या अभिमानापेक्षाही कुणबी हा शब्द धारण करत आरक्षण मिळवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्यांना अजून मराठा शब्दावर ठाम राहायचे त्यांनी राहावे. पण आम्हाला आरक्षण हवे असल्याने आम्ही कुणबी शब्द धारण करणार आहोत,’’ असे जरांगे यांनी सांगितले.

Story img Loader