वाई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येऊन स्मारकाला अभिषेक घालून विशिष्ट समाजाच्या मंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण केली जात आहे. हे निंदनीय कृत्य करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी अन्यथा राज्यभर फुले अनुयायी उग्र आंदोलन उभारतील असा इशारा नायगाव ग्रामस्थांनी दिला.

नायगाव येथे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री सावित्रीबाई फुले स्मारकास अभिवादन करून सभास्थळी कार्यक्रम सुरु असताना काही लोकांनी छगन भुजबळ आणि रुपालीताई चाकणकर यांचा निषेध करीत स्मारकास अभिषेक केला. मात्र या समाजकंटकांना सावित्रीबाई फुले कधी कळाल्याच नाही. मुळातच नायगावचा कार्यक्रम सामाजिक जडणघडण करणारा आहे. ते राजकीय व्यासपीठ नाही. स्मारकाच्या ठिकाणी असे कृत्य करून त्यांनी महापुरुषांची विटंबना केली आहे. पक्षीय राजकारण करीत येथे जातीय तेढ निर्माण केली गेली. हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी. सावित्रीबाई फुले स्मारका समोर नायगाव ग्रामस्थ फुले अनुयायांनी मोठ्या संख्येने एकत्र येवऊन भूमिका मांडली.

Mumbai municipal corporation
विश्लेषण : देशातल्या सर्वांत श्रीमंत महापालिकेला घरघर? मुंबई महानगरपालिकेच्या घटलेल्या मुदतठेवी चिंतेची बाब का?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
boricha marg Encroachment free news
मुंबई : चिंचपोकळी परिसरातील बोरीचा मार्ग अतिक्रमण मुक्त, पालिकेच्या जी दक्षिण विभागाची कारवाई
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
Deonar waste land for Dharavi project Revenue Department requests Municipal Commissioner to provide land
देवनार कचराभूमीची जमीन धारावी प्रकल्पाला; जमीन देण्याची महसूल विभागाची पालिका आयुक्तांना विनंती
Loksatta shaharbat Vasai suffers from heavy dust pollution
शहरबात: धूळ प्रदूषणाने वसईची घुसमट …
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 

आणखी वाचा-सांगली : अल्पवयीन तीन मुलींवर लॉजमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार; चौघांना अटक

फुले दाम्पत्यांच्या विचारधारेवर हे राज्य मार्गक्रमण करीत आहे. भाजपासोबत काही लोक गेले असतील तर तो त्यांचा राजकीय भाग आहे. कार्यक्रमात व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री आणि आमदार भाजपासोबत गेलेले होते. मग केवळ भुजबळ आणि चाकणकर यांचेच यांना वावडे का ? असा प्रश्न उपस्थित करीत हा केवळ जातीय संघर्ष निर्माण करण्यासाठी काही तरुणांनी केलेले कृत्य आहे. प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्याची धमक फुले अनुयायी यांच्यामध्ये आहे असा गंभीर इशारा नायगाव ग्रामस्थ , सरपंच , उपसरपंच , उत्सव कमिटी व सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी दिला.

Story img Loader