शिवसेनेत फूट पडून जवळपास दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. पण अद्याप सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल लागला नाही. शिवसेनेतील सत्तासंघर्ष आणि १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर, न्यायालयाने संबंधित निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घ्यावा, असा निकाल दिला होता. न्यायालयाच्या या आदेशानंतर राहुल नार्वेकर यांनी अद्याप १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्यास विलंब करत असल्याने आता ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

या सर्व घडामोडींनंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर टीकास्र सोडलं आहे. विधानसभा अध्यक्ष कुठलाच निर्णय देत नाहीत, त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. यामुळे विधानसभा अध्यक्ष केवळ वेळकाढूपणा करत आहे, हे आता स्पष्ट झालं आहे, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली. ते रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Congress MLAs praises of Haryana CM Saini
Congress : हरियाणा काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर? दोन आमदारांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल

हेही वाचा- शिवसेनेच्या दोन गटाच्या वादात अडकले आमदार भोंडेकर ; विधानसभा अध्यक्षांसमक्ष बाजू मांडताना नेमक काय घडलं,वाचा…

१६ आमदारांच्या अपात्रतेवर भाष्य करताना भास्कर जाधव म्हणाले, “आमचे वकील देवदत्त कामत होते. त्यांनी बाऊन्सर टाकला आणि विधानसभा अध्यक्षांना सांगितलं की, तुम्ही जो निर्णय द्याल, तो निर्णय आमच्यावर न्याय करणारा असेल किंवा अन्याय करणारा असेल. तो निर्णय खरा असेल किंवा खोटा असेल. निर्णय काहीही असला तरी आम्ही पुन्हा तुमच्याकडे पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही. पण तुम्ही काहीतरी निर्णय द्या. तुम्ही कुठलाच निर्णय देत नाहीत. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. यामुळे विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करतायत, हे स्पष्ट झालं.”

Story img Loader