ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि महाराष्ट्र सरकार जोरदार टीकास्र सोडलं आहे. देशातील महागाई, बेरोजगारी आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर आहेत. या प्रश्नांवरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून दंगली पेटवण्याचं काम सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. दरम्यान, त्यांनी केंद्र आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी हा आरोप केला.

यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले, “गेल्या दहा वर्षांत जेवढा भ्रष्टाचार झाला, तेवढा ब्रिटिशांनीही त्यांच्या काळात केला नसेल. काल गुजरातच्या मंत्रालयात नवीन घोटाळा उघडकीस आला आहे. भाजपाचा मित्र असलेल्या उद्योगपतीला ३७०० कोटींचा फायदा मिळवून दिला आहे. शक्तिसिंह गोयल यांनी बाहेर काढलेलं हे प्रकरण गंभीर आहे. अशी रोज नवनवीन प्रकरणं समोर येत आहेत. दररोज भ्रष्टाचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. केंद्रातील प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार आहे.”

Sanjay Dutt
संजय दत्तच्या चाहतीने त्याच्या नावावर केली होती ७२ कोटींची संपत्ती; कारण काय?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Four lakh devotees in Pandharpur for Maghi Ekadashi
टाळ-मृदंग, विठ्ठलनामाने दुमदुमली पंढरी!
subhash zambad loksatta news
१०० कोटींचा अपहार करणारे सुभाष झांबड आहेत कोण ?
Frequent attacks on teams preventing illegal sand mining Threat to kill female Talathi
वाळू माफियावर महसूल प्रशासनाचा वचक नाही? अवैध वाळू उपसा रोखणाऱ्या पथकांवर वारंवार हल्ले
four arrested including ex corporator swapnil Bandekar in Rs 10 crore extortion case
बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली १० कोटींची खंडणी; माजी नगरसवेक स्वप्निल बांदेकरसह चौघांना अटक
Chhatrapati Sambhajinagar, water , arrears ,
छत्रपती संभाजीनगरमध्ये नळजोडणीची १२१ कोटींची थकबाकी
Court comments on demolishing rehabilitation building in Maharashtra Sadan objecting to municipality actions
महाराष्ट्र सदन प्रकरणातील पुनर्वसन इमारत पाडण्याच्या कारवाईवर न्यायालयाचे ताशेरे

हेही वाचा- उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश

“देशात महागाई, बेरोजगारी आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर आहेत. या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी त्यांच्याकडे एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे दंगली पेटवायच्या. लव्ह जिहाद सारखे नसलेले मुद्दे चर्चेत आणायचे. मोर्चे काढायचे. हे कितीही केलं तरी २०२४ साली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात आणि देशात सत्तेत येणार नाही, अशी गॅरंटी ‘इंडिया’ आघाडीतर्फे आम्ही देत आहोत,” असंही संजय राऊतांनी सांगितलं.

Story img Loader